महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'अशी'ही गो-सेवा; जैस्वाल यांच्या हाकेवर येतात चारशे गाई - etv bhart special news

यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील पवन जैस्वाल यांच्या एका हाकेवर अनेक गाई त्यांच्या मागे लहान मुलांप्रमाणे येतात. कारण त्यांची गो-सेवा हीच मुक्या प्राण्यांसाठी लळा लावणारी ठरली आहे. मागील 25 वर्षापासून संत उद्धव बाबा गोरक्षण अंतर्गत त्यांचे गोरक्षणचे कार्य अविरत सुरू आहे. कधी कत्तलीसाठी जाणारे जनावरे पोलीस पकडतात तेव्हा पोलीस त्यांच्याकडे ही जनावरे आणतात. तर कधी शेतकरी यांच्याकडील वृद्ध जनावरे जैस्वाल यांच्याकडे आणून देतात आणि त्यासर्वांची स्वतः काळजी घेऊन जैस्वाल हे सांभाळ करतात.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Nov 4, 2021, 4:59 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील नेर येथील पवन जैस्वाल यांच्या एका हाकेवर अनेक गाई त्यांच्या मागे लहान मुलांप्रमाणे येतात. कारण त्यांची गो-सेवा हीच मुक्या प्राण्यांसाठी लळा लावणारी ठरली आहे. मागील 25 वर्षापासून संत उद्धव बाबा गोरक्षण अंतर्गत त्यांचे गोरक्षणचे कार्य अविरत सुरू आहे. कधी कत्तलीसाठी जाणारे जनावरे पोलीस पकडतात तेव्हा पोलीस त्यांच्याकडे ही जनावरे आणतात. तर कधी शेतकरी यांच्याकडील वृद्ध जनावरे जैस्वाल यांच्याकडे आणून देतात आणि त्यासर्वांची स्वतः काळजी घेऊन जैस्वाल हे सांभाळ करतात.

जैस्वाल यांच्या हाकेवर मागे येतात चारशे गाई

गोरक्षनात चारशे गाई

आज त्यांच्याकडे सुमारे चारशे गाई आणि जनावरे आहेत. गावाकडे ग्रामस्थांना महागाईच्या काळात सध्या जनावरे पालन करणे कठीण झाले आहे. अशावेळी काही व्यक्ती त्यांच्याकडील जनावरे जैस्वाल यांच्याकडे आणून सोडतात. खरे तर प्रत्येकाने एक दोन गाईंचे पालन केल्यास गाव खेड्यात शेती परिसर नंदनवन होईल, असा विश्वास जैस्वाल यांना आहे. यासाठी प्रत्येकाने गाईचे पालन करावे, असे त्यांचे म्हणणे आहे. आजारी असलेल्या गाईंची येथे नीट काळजी घेतली जाते.

पाच एकरात चाऱ्याची लागवड

गाईंना ढेप आणि चारा भरपूर प्रमाणात मिळावा यासाठी जैस्वाल स्वतः लक्ष देतात त्यांनी गाईंना बारामही चारा उपलब्ध व्हावा यासाठी त्यांनी पाच एकरमध्ये चाऱ्याची लागवड केली आहे. तो चारा वर्षभर जनावरांना पुरेसा होतो. येथील गाईच्या गोठ्याची स्वच्छता करणे आणि चारायला घेऊन जाण्यासाठी 10 व्यक्ती येथे मदत करत आहे. संत उध्दव बाबा यांच्या मंदिरात गाई, म्हशी आणि बकऱ्या, मेंढ्याही लोक आणून सोडल्या आहेत. त्यांचेही संगोपन पवन जैस्वाल करीत आहेत.

तबब्ल 12 हजार चौरस फुटाचा गोठा

तब्बल 12 हजार चौरस फुटावर असलेल्या गोठ्यात गाईंची देखभाल केली जाते. उन्हाळ्यात गाईंना हिरवा चारा मिळेल, अशी व्यवस्था केली जाते. विशेष म्हणजे पवन जैस्वाल यांचा आवाज ऐकताच या गाई हंबरडा फोडतात आणि त्यांच्याकडे धावून येतात. आपुलकी आणि मायेमुळे ते सर्व शक्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा -यवतमाळच्या वणीमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; उपोषणात होते सहभागी

ABOUT THE AUTHOR

...view details