महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला, शेतकऱ्यांसाठी बाजार समिती सुरूचं

खेरी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने संपूर्ण महाराष्ट्र बंद केला. या बंदला जिल्ह्यातील सर्वात जास्त उलाढाल असलेल्या बाजार समितीने पाठिंबा दिला. काळ्या फिती लावून निषेधही नोंदविला. परंतु जिल्ह्यातून सोयाबीन व इतर धान्य विक्रीसाठी आणत असलेल्या शेतकऱ्यांची कुठलीही अडचण होऊ नये यासाठी बाजार समितीत व्यवहार सुरू ठेवले होते.

By

Published : Oct 12, 2021, 7:48 AM IST

महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला, शेतकऱ्यांसाठी बाजार समिती सुरूचं
महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला, शेतकऱ्यांसाठी बाजार समिती सुरूचं

यवतमाळ - उत्तर प्रदेश येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने संपूर्ण महाराष्ट्र बंद केला. या बंदला जिल्ह्यातील सर्वात जास्त उलाढाल असलेल्या बाजार समितीने पाठिंबा दिला. काळ्या फिती लावून निषेधही नोंदविला. परंतु जिल्ह्यातून सोयाबीन व इतर धान्य विक्रीसाठी आणत असलेल्या शेतकऱ्यांची कुठलीही अडचण होऊ नये यासाठी बाजार समितीत व्यवहार सुरू ठेवले होते.

महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला, शेतकऱ्यांसाठी बाजार समिती सुरूचं
दोन दिवसांपासून शेतकरी बाजार समितीत

यवतमाळ बाजार समितीमध्ये सोयाबीनला सध्या पाच ते साडेपाच हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळेच यवतमाळ जिल्ह्यासह वर्धा, धामणगाव, देवळी, हिंगणघाट, वाशिमब या जिल्ह्यातून शेतकरी शुक्रवारपासून सोयाबीन विक्रीसाठी आणत आहे. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुट्टी असल्याने आजही बाजार समिती बंद ठेवली तर शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होऊ शकते आणि म्हणूनच बाजार समिती प्रशासनाने खेरदि सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या बाजार समितीमध्ये दिवसाला साडेतीन ते चार हजार क्विंटल सोयाबीनची सध्या आवक सुरू असून दरही चांगला मिळत आहे.

शेतकऱ्यांचा बंदला पाठींबा नाही

मागील तीन वर्षापासून सतत शेतकरी आर्थिक नुकसानीत आहे. यावर्षी ओल्या दुष्काळाने आधी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पंचनामे झाले नाहीत, पिक विमा मिळाला नाही, नुकसान भरपाई झाली नाही आणि अशात हा बंद महाविकास आघाडी केला. हा बंद शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. सरकार कोणाची असो शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही. त्यामुळे कुठल्याही पक्षाच्या किंवा सत्ताधाऱ्यांनी बंद ठेवला तर शेतकरी यात सहभागी होणार नाही. शेतकऱ्यांनी जर बंद ठेवला तरच बंद करू अशी भूमिका एका शेतकऱ्याने यावेळी घेतली होती.

हेही वाचा -भाजपाला सत्तेची मस्ती, अद्यापही केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही - सुप्रिया सुळे

ABOUT THE AUTHOR

...view details