यवतमाळ -पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी निगडीत पंचतत्वांचे संवर्धन करण्यासाठी संपूर्ण राज्यात 'माझी वसुंधरा' हे अभियान राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षारोपण करून उपस्थितांना पर्यावरण संवर्धनासाठी 'हरीत शपथ' दिली.
'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत पालकमंत्र्यांनी दिली हरित शपथ नगरपालिका, नगरपंचायत राबविणार अभियान'माझी वसुंधरा' अभियान हे नगर परिषद आणि नगर पंचायतीच्यावतीने राबविण्यात येणार असून यवतमाळ जिल्ह्यात 10 नगर परिषदा व सहा नगर पंचायती आहेत. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक नगर परिषद, नगर पंचायतीमार्फत अभियानाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत 17450 वृक्षारोपण करण्यात आले असून यात प्रामुख्याने कडूनिंब, गुलमोहर, वड आणि पिंपळसारख्या भारतीय प्रजातींच्या वृक्षांना प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्यात हरीतकरण वाढविण्यासाठी उद्याने संवर्धन व सौंदर्यीकरण, रस्याच्या बाजुला वृक्षारोपण यासारखे उपक्रम सुरू आहे.
'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत पालकमंत्र्यांनी दिली हरित शपथ जिल्हाधिकाऱ्यांनी दिली शपथजिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी वृक्षारोपण करून सर्व विभागप्रमुख व कर्मचा-यांना हरीत संवर्धनाची शपथ दिली. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, नगर पालिका प्रशासन अधिकारी हर्षल गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर राठोड, माहिती व सुचना केंद्राचे प्रमुख राजेश देवते उपस्थित होते.