ओल्या दुष्काळाची मदत कागदावरच; बैलजोड्या विकून जगण्याची बळीराजावर वेळ - यवतमाळ शेतकरी न्यूज
ओल्या दुष्काळाची मदत लालफितशाहित अडकून पडली आहे. काही नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप एक रुपयाही मिळाला नाही. त्यामुळे बळीराजवर आपली बैलजोडी विक्री करून घरखर्च आणि कर्ज फेडण्याची वेळ आली आहे.
![ओल्या दुष्काळाची मदत कागदावरच; बैलजोड्या विकून जगण्याची बळीराजावर वेळ ailjodi_viknyac](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10089681-644-10089681-1609568582090.jpg)
बैलजोड्या विकून जगण्याची बळीराजावर वेळ
यवतमाळ - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2020-21'चा खरीप हंगाम अतिशय बिकट व आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त करणारा ठरला. बनावट बियाणे, अतिवृष्टी, बोन्डअली मुळे पीक हातचे गेले. तर हाती आलेले पीक कोरोना सारख्या रोगाच्या प्रादुर्भावाच्या कालखंडात मातीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. ओल्या दुष्काळाची मदत लालफितशाहितच अडकून पडली आहे. त्यामुळे बळीराजवर आपली बैलजोडी विक्री करून घरखर्च आणि कर्ज फेडण्याची वेळ आली असल्याची खंत अल्पभूधारक शेतकरी प्रल्हाद राठोड या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
बैलजोड्या विकून जगण्याची बळीराजावर वेळ
बैलजोड्या विकून जगण्याची बळीराजावर वेळ
Last Updated : Jan 2, 2021, 1:08 PM IST