महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कापूस खेरेदी केंंद्रांअभावी शेतकऱ्यांची लूट; दीड ते २ हजार रुपयांचे नुकसान - cotton procurement Yavatmal

दिवाळी आली, मात्र अजूनही सीसीआय आणि पणन महासंघाचे कापूस खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत. शेतकऱ्यांना नाईलाजाने त्यांचा कापूस हमीभावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांना विक्री करावा लागत आहे. यात शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १ हजार ५०० ते २ हजार रुपयांचे नुकसान होत आहे.

cotton procurement Yavatmal
कापूस खेरेदी केंंद्रांअभावी शेतकऱ्यांची लूट

By

Published : Nov 14, 2020, 4:10 AM IST

यवतमाळ - दिवाळी आली, मात्र अजूनही सीसीआय आणि पणन महासंघाचे कापूस खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत. शेतकऱ्यांना नाईलाजाने त्यांचा कापूस हमीभावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांना विक्री करावा लागत आहे. यात शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १ हजार ५०० ते २ हजार रुपयांचे नुकसान होत आहे.

माहिती देताना शेतकरी

सरकारने कापसाला ५ हजार ८२५ इतका हमी भाव जरी जाहीर केला असला, तरी आज शासकीय खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना त्यांचा कापूस ३ हजार ८०० ते ४ हजार २०० रुपयांना विकावा लागत आहे. व्यापारी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांची कोंडी करीत आहेत आणि कमी दराने कापूस खरेदी करीत आहेत. त्यामुळे, मायबाप सरकार आता तरी लक्ष द्या, शेतकरी लुटला जात आहे, अशी आर्त हाक जिल्ह्यातील शेतकरी देत आहेत.

आठ ते दहा रुपये किलोने वेचणी

सोयाबीन हातचे गेले. कापसावर शेतकऱ्यांची भिस्त होती. मात्र, अती पावसाने बोंडसड आणि बोंडअळी आल्याने शेतकरी अडचणीत सापडला. पहिल्या वेच्यात शेतातील कापूस संपत आहे. जे बोंड आहेत त्यात अळी निघत आहेत. अशात फुटलेला कापूस शेतकऱ्यांना ८ ते १० रुपये प्रति किलो दराने वेचणी करावा लागत आहे. त्यात 'मेटकरी' नावाचा व्यक्ती मजूर उपलब्ध करून दिल्याबद्दल शेतकऱ्यांकडून जादा पैसे उकळत आहे.

कर्जवसुलीसाठी सावकार दारात

कसा बसा कापूस घरी आणला तर कृषी केंद्र चालक उसनवारी मागण्यासाठी व कर्जवसुलीसाठी सावकार शेतकऱ्यांच्या दारात उभे राहात आहेत. त्यात दिवाळी असल्याने मजुरांचे कापूस वेचणीचे पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांना खासगी व्यापारी किंवा खेडा खरेदी सुरू असलेल्या ठिकाणी कापूस विक्री करावी लागत आहे. त्यातच व्यापारी कापसात मॉईश्चर जास्त आहे, असे कारण सांगून शेतकऱ्यांची लूट करत आहेत. यावर लक्ष देण्याची गरज आहे.

कापूस खरेदी केंद्रे कधी सुरू होणार?

शेजारच्या तेलंगाणा राज्यात २९ ऑक्टोबरला सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाली. मात्र, महाराष्ट्रात कापूस खरेदीसाठी मुहूर्त केव्हा मिळेल, असे शेतकरी विचारत आहेत. सरकारी कापूस खरेदी केव्हा सुरू होईल, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

गरज आहे म्हणून खेडा खरेदी ठिकाणी शेतकरी कापूस विक्री करत आहे. शासकीय खरेदी सुरू होईपर्यंत शेतकऱ्यांच्या घरातील कापूस व्यापाऱ्यांना कमी दरात विकून झालेला असेल, तेव्हा सरकार व्यापाऱ्यांसाठी कापूस खरेदी सुरू करणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता सरकार शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी केव्हा पावले उचलले या कडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

१३ खरेदी केंद्र सुरू होणार

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी सीसीआई व पणन महासंघाचे १३ कापूस खरेदी केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्याचे नियोजनही करण्यात आले आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांनी हमी भावात आपला कापूस विकावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कटके यांनी केले आहे.

हेही वाचा-दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मातीत गाडून घेऊन आंदोलन; घाटंजी येथील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details