यवतमाळ - आर्णी, महागाव, उमरखेड, दारव्हा, दिग्रस, घाटंजी तालुक्यातील गावात शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. या भूकंपाची तीव्रतेमुळे उमरखेड, महागाव तालुक्यातील काही घरांना तडे गेले आहेत. तर महागाव तालुक्यातील, डोंगरगाव, हिवरा,फुलसावंगी, वरोडी, पोहंडूळ, धनोडा, पेढी, काळी (दौ), बोरी इजारा, साई, करंजखेड, कासारबेहळ, काळी टेंभी आणि चिल्ली अशा ६० गावात भूकंपाचे झटके जाणवले. यामुळे नागरिकांची धावपळ उडाली.
जिल्ह्यातील अनेक गावात भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. काही गावांतील घरावरील पत्रे हलल्याने नागरिक भयभीत झाले. भूकंपानंतर नागरिक घराबाहेर पडले. यात कुठेही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.