यवतमाळ- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्यूचा आकडा वाढत असला तरी दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत ४ हजारांवर कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या २४ तासात वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोविड केअर सेंटर, तसेच कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले १७३ नागरिक 'निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह' झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर, जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून २५८ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.
मृत्यू झालेल्या ५ जणांमध्ये ३ पुरुष व २ महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील ७५ वर्षीय पुरुष व ४९ वर्षीय महिला, पांढरकवडा शहरातील ४७ वर्षीय पुरुष, वणी शहरातील ९० वर्षीय महिला आणि दारव्हा शहरातील २४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या २५८ जणांमध्ये १६० पुरुष व ९८ महिला आहेत. यात आर्णी शहरातील १५ पुरुष व ५ महिला, आर्णी तालुक्यातील १ महिला, दारव्हा शहरातील ७ पुरुष व ४ महिला, दारव्हा तालुक्यातील एक पुरुष, दिग्रस शहरातील २ पुरुष व २ महिला, घाटंजी शहरातील ४ पुरुष व एक महिला, घाटंजी तालुक्यातील एक पुरुष, कळंब शहरातील २ पुरुष व २ महिला, कळंब तालुक्यातील ४ पुरुष, महागाव शहरातील २३ पुरुष व १४ महिला, महागाव तालुक्यातील एक महिला, नेर शहरातील एक पुरुष, नेर तालुक्यातील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील १५ पुरुष व ५ महिलांचा समावेश आहे.