महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 17, 2019, 3:18 AM IST

ETV Bharat / state

अत्यल्प पावसामुळे सर्व प्रकल्पांमधील पाणीसाठा 50 टक्क्यांवर; रब्बीतील सिंचन घटणार

गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण घटल्याने जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये जवळपास 50 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला, तरिही रब्बी हंगामातील सिंचन घटणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये जवळपास 50 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे

वाशिम - गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण घटल्याने जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये जवळपास 50 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला, तरिही रब्बी हंगामातील सिंचन घटणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये जवळपास 50 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे

यंदाचा मान्सून संपत आल्यानंतरही जिल्ह्यातील लहान-मोठे 134 प्रकल्प कोरडेच होते. मात्र, मागील तीन दिवसात झालेल्या रिमझिम पावसामुळे तीन मध्यम तसेच 131 लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा 50 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात 50 टक्क्याहून जास्त पाणी साचल्याने स्थानिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

हेही वाचा शाश्वत कृषी सिंचन योजनेस मान्यता; शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे शासनाचे ध्येय

परंतु, या प्रकल्पावर आधारित रब्बी हंगामातील सिंचन क्षेत्र घटणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details