महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रिय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांचा भन्नाट उपक्रम, संक्रांतीच्या मडक्यांचा झाडे जगवण्यासाठी वापर - वाशिम मकरसंक्रांत

मकरसंक्रांत व मडके यांचे अतूट नाते असते. मात्र, मडक्यांचा सणाला वापर झाल्यानंतर कचऱ्यात टाकून दिले जाते. साहजिकच जिथे पाणी थंड करुन पिण्यासाठी मडक्यांचा वापर होई तिथे आता रेफ्रीजेटरचा वापर होऊ लागल्यामुळे फ्रीजमधून निघणाऱ्या क्लोरोफ्लोरो कार्बन वायूमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली.

washim-student-did-model-which-is-helpful-for-the-tree-irrigation
राष्ट्रिय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांचा भन्नाट उपक्रम, संक्रांतीच्या मडक्यांचा झाडे जगवण्यासाठी वापर

By

Published : Jan 23, 2020, 11:58 AM IST

वाशिम -मकर संक्रांतीला महिलांना मडक्यांमध्ये वाण देऊन सण साजरा केला जातो. याच मडक्यांचा वापर पुन्हा यापूर्वी उन्हाळ्यात पाणी थंड करण्यासठी केला जात होता. मात्र, आजच्या आधुनिक काळात मडक्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे पर्यावरणपुरक अशा मडक्यांचा वापर करुन झाडे जगवली जाऊ शकतात व प्रदुषणालाही आळा घालता येणार आहे. अशा प्रकारची जनजागृती मोहिम एमएमसी इंग्लिश स्कूलचे राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतली आहे.

राष्ट्रिय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांचा भन्नाट उपक्रम, संक्रांतीच्या मडक्यांचा झाडे जगवण्यासाठी वापर

हेही वाचा -डोळ्यापुढे धूर.. गुदमरणारा श्वास..अन् आक्रोश.. 'झेन'ने सांगितला आगीचा थरार

मकरसंक्रांत व मडके यांचे अतूट नाते असते. मात्र, मडक्यांचा सणाला वापर झाल्यानंतर कचऱ्यात टाकून दिले जाते. साहजिकच जिथे पाणी थंड करुन पिण्यासाठी मडक्यांचा वापर होई तिथे आता रेफ्रीजेटरचा वापर होऊ लागला. त्यामुळे फ्रीजमधून निघणाऱ्या क्लोरोफ्लोरो कार्बन वायूमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली. पण यावर पर्याय म्हणून एसएमसी इंग्लिश स्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक अभिजीत जोशी व प्राचार्य मीना उबगडे यांच्या मार्गर्शनातून वृक्ष वाचविण्यासाठी एक भन्नाट नमुना तयार करण्यात आला आहे.

संकल्पना -

मडक्यांच्या बुंध्यापाशी एका फुट खड्डा खणून त्यात मडके ठेवावे व त्यानंतर त्याला एक छिद्र पाडून त्यात कापसाची किंवा कपड्यांची वात लावावी. त्यानंतर मडक्यामध्ये टाकलेले पाणी वृक्षांच्या मुळांना पोहोचते. यातील भरलेले पाणी जवळपास झाडांना दोन ते तीन दिवस सहज पुरते. आपण झाडांना पाईपद्वारे किंवा हाताने पाणी दिल्यास त्याचे जवळपास नव्वद टक्के बाष्पीभवन होते. परंतु, या पध्दतीचा अवलंब केल्यास हे पाणी हळुहळु झाडांच्या मुळांना उपयोगी पडते.

ABOUT THE AUTHOR

...view details