वाशिम- जिल्ह्यात खरिपातील सोयाबीन काढणीच्या हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन हातचे गेले. त्यानंतर रब्बीतील गहू, हरभरा, पिकांची अवकाळी पावसाने नासाडी झाली. मात्र, तरीही न डगमगता कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार येथील शेतकऱ्यांनी 20 एकरावर उन्हाळी सूर्यफूल पीक घेतले आहे.
20 एकरात घेतले उन्हाळी सूर्यफुलाचे पीक - वाशिम लेटेस्ट न्यूज
कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार येथील शेतकऱ्यांनी 20 एकरावर उन्हाळी सुर्यफूल पीक घेतले आहे.
![20 एकरात घेतले उन्हाळी सूर्यफुलाचे पीक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7247981-513-7247981-1589799327446.jpg)
दरम्यान, त्यांचा हा प्रयोग चांगलाच फायद्याचा ठरला असून पीक चांगलच बहरले आहे. त्यामुळे दोन्ही हंगाम हातातून गेल्यावरही सुर्यफूल पिकातून एकरी 8 ते 10 क्विंटल उत्पन्न अपेक्षित असल्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
20 एकरात घेतले उन्हाळी सुर्यफूलाचे पीक