महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 19, 2019, 9:29 AM IST

ETV Bharat / state

काश्मीरच्या जमिनी घेण्यासाठी 370 कलम रद्द - प्रकाश आंबेडकर

काश्मीरच्या जमिनी घेण्यासाठी 370 कलम रद्द केली असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.

अॅड. प्रकाश आंबेडकर

वाशिम- विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपचे अमित शाह आणि नरेंद्र मोदी महाराष्ट्रात प्रचारसभेत 370 चा मुद्दा घेत आहेत. मात्र, भाजप सरकार दलालाचे सरकार आहे. काश्मीरच्या जमिनी घेण्यासाठी 370 कलम रद्द केली असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. वाशिम जिल्ह्यातील तीनही मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वाशिममध्ये आले असता बोलत होते.

आज देशातील शेतकऱ्यांची चिंता कोणत्याच पक्षाला नाही. काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस ईडीला घाबरतात तर सेना ही त्यांच्याबरोबर आहे. त्यामुळे हमीभावाबद्दल कुणीच बोलत नाही. शेतकरी संघटनेचे नेते सर्वच मूर्ख असल्याची टीका ही यावेळी आंबेडकर यांनी जाहीर सभेत केली आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवीत घेतली रामराव महाराजांची भेट

केंद्रातील वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे तुम्ही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घ्या, असा सल्ला दिला. मात्र, आता वित्त मंत्री बोलतायत, की अर्थव्यवस्था मनमोहन सिंग यांच्या काळात ढासळली, अशी टीका ही यावेळी आंबेडकर यांनी जाहीर सभेत केली.

हेही वाचा - २१ वर्ष उलटूनही 'या' गावाला नाही ग्रामपंचायत, ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

ABOUT THE AUTHOR

...view details