वाशिम- जिल्ह्यात दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच पहिल्या पावसात मानोरा तालुक्यातुन वाहणारी अरुणावती नदी दुथडी भरून वाहत आहे. वाशिम जिल्ह्यातून नागपुर- औरंगाबाद दृतगती मार्गावर येडशी फाट्यानजीकच्या मरिमाता मंदिराजवळील पूल खचल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता.
मुसळधार पावसामुळे नदी व नाले तुडूंब भरले आहेत. काही शेतातच बांध फुटल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाशिम जिल्ह्यातून नागपूर- औरंगाबाद महामार्गावर येडशी फाट्यानजीकच्या मरिमाता मंदिराजवळील पूल खचल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
हेही वाचा-गुरुजी तुम्ही सुद्धा... जुगार खेळताना 4 शिक्षकांसह 9 जणांना अटक