वाशिम- शासनाच्या किमान आधारभूत किमत योजनेंतर्गत जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०१८ मध्ये ऑनलाईन नोंदणी करून आपला शेतमाल विक्री केला होता. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप त्यांच्या शेतमालाचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे, तालुक्यातील तीन शेतकऱ्यांनी १५ ऑगस्ट पर्यंत पैसे न मिळाल्यास आत्मदहन कारण्याचा ईशारा, निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
नाफेडचे रखडलेले पैसे १५ ऑगस्टपर्यंत परत द्या, अन्यथा.. - gyaneshwar aawchar
शेतकऱ्यांनी २०१८ मध्ये ऑनलाईन नोंदणी करून शासनाच्या किमान आधारभूत किमत योजनेंतर्गत, जिल्ह्यातील नाफेड केंद्रावर हरभरा विक्री केला होता. मात्र, त्यांना आपल्या शेतमालाचे अद्याप पैसे मिळाले नाहीत.

ज्ञानेश्वर उत्तम आवचार, गोपाल प्रकाश पारीसकर व नारायण नामदेव गोटे, असे पीडित शेतकऱ्यांची नावे आहेत. बाजारात शेतमालाला दर मिळत नसल्यामुळे या शेतकऱ्यांनी २०१८ मध्ये ऑनलाईन नोंदणी करून शासनाच्या किमान आधारभूत किमत योजनेंतर्गत, जिल्ह्यातील नाफेड केंद्रावर हरभरा विक्री केला होता. मात्र, त्यांना आपल्या शेतमालाचे अद्याप पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे पीडित शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना १५ अगस्टपूर्वी पैसे जमा न झाल्यास सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.