महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेचे युवराज पेंग्वीनसाठी रडतात, म्हणून ते पेंग्वीनच - धनंजय मुंडे - Ajit Pawar

शिवसेनेने 'जन आशीर्वाद' यात्रा काढली आहे. त्यात ते युवासेना प्रमुखांना मुख्यमंत्री करणार असे म्हणतात. मात्र, आदित्य ठाकरे पेंग्विनसाठी रडतात त्यामुळे त्यांना पेंग्विन म्हटले पाहिजे अशी टीका, धनंजय मुंडे यानी 'शिवस्वराज' यात्रे निमित्त कारंजा येथे आले असता जाहीर सभेत केली.

धनंजय मुंडे

By

Published : Aug 20, 2019, 4:45 PM IST

वाशिम- आम्ही राज्यात मोठ्या प्रमाणात विहिरी केल्या, शेततळे केले असे मुख्यमंत्री 'महाजनादेश' यात्रेत सांगतात. मात्र, प्रत्यक्षात विहिरी आणि शेततळे गायब झाल्याचे चित्र आहे. या सरकारने खोदलेल्या विहिरी जन सामान्यांना दिसत नाही. ते फक्त पुण्यवान भाजप कार्यकर्त्यांनाच दिसते, असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर लावला आहे.

धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्र्यांसह युवासेना प्रमुखांवर कडाडून टीका

शिवसेनेने 'जन आशीर्वाद' यात्रा काढली आहे. त्यात ते युवासेना प्रमुखांना मुख्यमंत्री करणार असे म्हणतात. मात्र, आदित्य ठाकरे पेंग्विनसाठी रडतात त्यामुळे त्यांना पेंग्विन म्हटले पाहिजे अशी टीका, धनंजय मुंडे यानी 'शिवस्वराज' यात्रे निमित्त कारंजा येथे आले असता जाहीर सभेत केली.

आमचे सरकार आल्यावर सरसकट सातबारा कोरा करू

भाजप सरकारने गेल्या वर्षात सर्वांच्या अपेक्षाभंग केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात रोज खून होत आहेत. त्यामुळे आपण किती सुरक्षित आहोत हे यावरून स्पष्ट होत आहे. दिवसाला ५ ते ६ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र, सरकार या परिस्थितीत महाजनादेश यात्रा काढत आहे. त्यामुळे आमचे सरकार आल्यावर सरसकट सातबारा कोरा करू. त्याचबरोबर राज्यात असलेल्या लाखो रिक्त जागा भरू. त्यामुळे अनेकांना नोकऱ्या मिळतील, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत बोलताना दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details