महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिममध्ये समृद्धी महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या गौणखनिजाचा साठा करण्साठी खोदलेल्या शेततळ्यामुळे पिकांचे नुकसान - farmer Compensation

समृद्धी महामार्गावर काम पीएनसी या कंपनीच्या मार्फत कारंजा तालुक्यात मागील अनेक महिन्यापासून सुरू आहे. या कंपनीच्यावतीने गौण खनिजसाठ्यासाठी शासनाच्या इ-क्लास जमिनीवर शेततळे खोदण्यात आले आहे.

शेतात साचलेलं पाणी

By

Published : Sep 26, 2019, 2:44 AM IST

वाशिम: गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या प्रवासातील पाऊस कमी - अधिक प्रमाणात बरसत आहे. दरम्यान, कारंजा तालुक्यातील धोत्रा देशमुख येथील शेतकऱ्याच्या शेतालगतचा समृद्धी महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या गौणखनिजसाठा साठी खोदलेले शेततळे पाण्याने तुडुंब भरल्याने या शेततळ्यातील पाणी शेतात गेले. त्यामुळे परिसरातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे..

शेतातील पिकांचं नुकसान झाल्यानं भरपाईची मागणी करताना शेतकरी
समृद्धी महामार्गावर काम पीएनसी या कंपनीच्या मार्फत कारंजा तालुक्यात मागील अनेक महिन्यापासून सुरू आहे. या कंपनीच्यावतीने गौण खनिजसाठ्यासाठी शासनाच्या इ-क्लास जमिनीवर शेततळे खोदण्यात आले आहे. हे शेततळे पावसाच्या पाण्याने ओव्हरफ्लो झाल्याने धोत्रा देशमुख येथील शेतकऱ्याच्या शेतात पाणी घुसले आहे. या शेतकऱ्याचे सहा एकरातील सोयाबीन व तूर पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे नुकसानभरपाई मागणी करून केली. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details