महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतीपंपाची तोडलेली वीज पुन्हा जोडावी यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा रास्तारोको - भूमिपुत्र शेतकरी संघटने बद्दल बातमी

शेतीपंपाची तोडलेली वीज पुन्हा जोडावी यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने रास्तारोको आंदोल केले. शेतकऱ्यांची वीजबिल माफ केले नाही तर यापुढे उग्र आंदोलन करणार असल्याचे यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगण्यात आले.

Bhumiputra Farmers' Association staged a Rastaroko agitation to reconnect the broken power of the agricultural pump
शेतीपंपाची तोडलेली वीज पुन्हा जोडावी यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा रास्तारोको

By

Published : Mar 18, 2021, 8:01 PM IST

वाशिम -वाशिम जिल्ह्यात तोडलेला वीजपुरवठा त्वरित जोडण्यात यावा, यासह विविध मागण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने अकोला - नांदेड माहामार्गावरील जिजाऊ चौकात रास्तारोको करण्यात आला. शेतकऱ्यांची वीजबिल माफ केले नाही तर यापुढे उग्र आंदोलन करणार असल्याचे यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगण्यात आले. तासभर चाललेल्या रास्तारोको आंदोलनामुळे बराचवेळ वाहतूक ठप्प झाली होती.

कृषी पंपाची वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडले जात आहे, तर कोठे डीपीच बंद केला आहे. वाशिम जिल्ह्यात मात्र या कारवाईमुळे संतप्त झालेल्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

मालेगाव आणि रिसोड मध्येही रास्ता रोको -

भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेला हा रस्ता रोको आंदोलन मालेगाव आणि रिसोड शहरांमध्येही करण्यात आले. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

काय आहेत मागण्या -

  1. वाशिम जिल्ह्यातील तोडलेला वीजपुरवठा त्वरित जोडण्यात यावा.
  2. सक्तीची वीजबिल वसुली बंद करावी.
  3. कृषी पंपाचे वीजबिल थकबाकी 100 टक्के माफ करावीत.

ABOUT THE AUTHOR

...view details