वर्धा- विधानसभा मतदारसंघाचे निकाल आले आहेत. जिल्ह्याच्या निवडणुकीत महत्वाची समजली जाणारी जागा म्हणजे देवळी आणि आर्वी मतदारसंघ. देवळीत रणजित 'दादा' कांबळे आणि आर्वीत 'दादा'राव केचे यांच्या 'दादा'गिरीचा विजय झाला. तसेच भाजपचे पंकज 'भाऊ' भोयर हे वर्धा आणि हिंगणघाट मतदारसंघातून समीर भाऊ कुनावा या दोघांच्या 'भाऊ गिरीला पसंती मिळाली आहे. देवळीतून काँग्रेसचे रणजित कांबळे सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. तर, मागील निवडणुकीत दोन काँग्रेस, दोन भाजप हे समीकरण मोडीत काढून भाजपणे तीन जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे.
हेही वाचा -यावेळीही जनतेची 'राजा'ला साथ नाहीच? मनसेला नाकारण्याची ही ५ आहेत कारणे...
वर्ध्यात भाजपचे विद्यमान आमदार पंकज भोयर आणि काँग्रेसचे शेखर शेंडे यांच्यात शेवटपर्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. यात शेखर शेंडे यांचा तिसऱ्यांदा पराभव झाला असून पंकज भोयर यांनी त्यांचा दुसऱ्यांदा पराभव केला आहे. यात पंकज भोयर यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यापूर्वीचा काँग्रेसचे शेखर शेंडे यांनी भाष्य करत पराभव स्वीकारल्याची चर्चा केली होती. तसेच अभद्र युतीत मिळालेली मदत पाहता ही लढत रंगतदार राहिली.
देवळी मतदारसंघ
देवळी मतदारसंघ हा काँग्रेसला साथ देणारा तसेच महत्वाचा मतदारसंघ आहे. यात दिवंगत प्रभाराव यांचा वारसा सांभाळणारे रणजित कांबळे यांनी दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे भाजपचे बंडखोर जिल्हाध्यक्षांचा पराभव केला. तेच राष्ट्रवादीतून भाजपच्या हाऊसफुल बोर्डनंतर शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला खरा पण, तिर निशाण्यावर न बसल्याने पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे त्यांना शिवसेनेसारख्या पक्षाची तिकीट भेटून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवता आली नाही, तेच बंडखोरी करत बकाने यांना दुसरे स्थान मिळाल्याने वेगवेगळ्या चर्चा मतदारसंघात ऐकायला मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत निसटता विजय मिळवला असताना यंदा मात्र रणजित कांबळे यांनी 35 हजार 804 मतांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत. त्यानी स्वतःचे जुने रेकॉर्ड मोडीत काढत विजय आणि गड कायम ठेवला हे विशेष.