महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बस न थांबल्याने विद्यार्थी आक्रमक; नागपूर-अमरावती महामार्गावर रास्ता रोको - students protest on highway

कारंजा तालुक्यातील सावळी खुर्द फाट्यावर बस न थांबल्याने विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको केले. यामुळे वाहनांची मोठी रांग लागली होती.

कारंजा तालुक्यातील सावळी खुर्द फाट्यावर बस न थांबल्याने विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रस्तारोको केले. यामुळे वाहनांची मोठी रांग लागली होती.

By

Published : Aug 6, 2019, 5:42 PM IST

Updated : Aug 6, 2019, 8:14 PM IST

वर्धा - कारंजा तालुक्यातील सावळी खुर्द फाट्यावर बस न थांबल्याने विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रस्तारोको केले. यामुळे वाहनांची मोठी रांग लागली होती. नागपूर-अमरावती महामार्गावरील गावांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. यामुळे आज संतप्त विद्यार्थ्यांनी हे पाऊल उचलले. आखेर बस गावात येण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मार्ग सोडला.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर कारंजा तालुक्यातील सावळी बद्रुक फाट्यावर विद्यार्थी कारंजा येथील शाळेत जाण्यासाठी पोहचले. जवळपास 100 विद्यार्थी एकार्जुन गावातून 4 ते 5 किमी पायपीट करत पहाटे फाट्यावर येतात. अनकेदा पहिली बस न थांबता पुढे गेल्यास विद्यार्थ्यांना जवळपास एक ते दोन तास शाळेत जाण्यास उशीर होतो. त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे.

दोन वर्षांपूर्वी बस गावात जात होती. परंतू, कालांतराने ही बससेवा बंद झाली. त्यामुळे वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला असल्याचे गौरव ठाकरे या विद्यार्थ्याने सांगितले.यावेळी विद्यार्थ्यांनी पंचायत समितीचे सभापती मंगेश खवशी यांना बोलावले. त्यांनी तळेगांव डेपोचे व्यवस्थापक पांडे यांच्याशी संपर्क साधून डेपो मॅनेजरशी चर्चा केली असता सर्वांनी सकाळी व सायंकाळी ६ ला तसेच दुपारी दीड वाजता बस गावात सुरू करण्याची मागणी केली.

या घटनेनंतर डेपो मॅनेजर यांनी सकाळी व संध्याकाळी बस सुरू करण्याचे आश्वासन दिले. तसेच दुपारी दीडच्या बसचे लवकरच नियोजन करण्याचे सांगितल्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला.

Last Updated : Aug 6, 2019, 8:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details