वर्धा- वर्षातील सर्वात मोठा समजला जाणारा दिवाळी हा सण, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठपला आहे. यावेळी खरेतर, सर्व घरांमध्ये खरेदीची लगबग सुरु असते. मात्र, महाराष्ट्र राज्य परिवाहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या घरी मात्र वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. ऐन दिवाळीतही या कर्मचाऱ्यांना बोनस तर मिळाला नाहीच, मात्र त्यांचे वेतनदेखील अजून मिळाले नाहीये.
शुक्रवारपासून दीपावली हा सण सुरु होतोय. मागील वर्षापासून दिवाळीपूर्वी मिळणारे वेतन आणि बोनस, हे यंदा दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठपली तरी मिळाले नाहीये. वेतन न मिळण्यामागे, परिवाहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा हे कारण असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमधून ऐकायला मिळते आहे.