वर्धा - हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. या घटनेचा सर्व स्तरावरून निषेध होत आहे. आर्वी आणि पुलगाव येथे मूक मोर्चा तर सेलूत कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली.
आर्वी शहरातील प्रमुख सुभाषचंद्र बोस पुतळ्यापासून या मूक मोर्चाला सुरुवात झाली होती. मोर्चाचा समारोप उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांना निवेदन देऊन करण्यात आला. मोर्चात आमदार दादाराव केचे, नगराध्यक्ष प्रशांत सवावलाखे यांच्यासह डॉ. अरुण पावडे, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा -हिंगणघाट जळीतकांड : 'हे' मंत्री महोदय करणार लाक्षणिक उपोषण