महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात १० दिवसांच्या प्रतिक्षेनंतर कोसळधार - वर्धा पाऊस बातमी

जिल्ह्यात पावसामुळे सोयाबीन पीक हातचे गेले आहेच काही भागात परिस्थिती समाधान कारक असल्यास सतत पाऊस झाल्यास फटका बसण्याची शक्यता आहे. तेच कपाशीच्या झाडाची पाती गळ होण्याची शक्यताही नाकारली जाऊ शकत नाही.

पाऊस
पाऊस

By

Published : Sep 11, 2020, 4:35 AM IST

वर्धा - मागील दहा दिवसानंतर वर्ध्यात गुरुवारी पावसाच्या सरी बरसल्या. मागील काही दिवसांपासून वातावरणामुळे उकाळ्याने हैराण करणारा पाऊस होता. जिल्ह्याच्या इतर भागात पावसाने हजेरी लावली आहे. पण वर्ध्यात गुरुवारी हलके ढगाळ वातावरण असतांना अचानक दुपारी पावसाने जोरदार बॅटिंग केली.

वर्धा पाऊस
मागील काही दिवसात उकाळ्याने चीड निर्माण करणारे वातावरण झाले होते. अशातच पाऊस पडावे असे वाटत असताना तब्बल 10 दिवसाचा खंड पडला होता. पण आज दुपारी झालेल्या पावसाने चांगलीच हजेरी लावली. धुवादार झालेल्या पावसाने 10 दिवसाची भरपाई काढली. यामुळे शहरात झालेल्या पावसाने पावसात भिजण्याची वेळ आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा वर्धेकराना अनुभवायला मिळाला आहे. यात वातावरणात तब्बल दीड तास झालेल्या पावसाने रस्ते धुवून काढले. यात झालेल्या पावसाने शहरातील सिमेंट रस्त्यावर पाणी साचलेले पाहायला मिळाले. यामुळे शहरासह सेलू देवळी आणि आर्वी तालुक्यातही दमदार पावसाने हजेरी लावली. अनके भागात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. यात सोयाबीन पीक हातचे गेले आहेच काही भागात परिस्थिती समाधान कारक असल्यास सतत पाऊस झाल्यास फटका बसण्याची शक्यता आहे. तेच कपाशीच्या झाडाची पाती गळ होण्याची शक्यताही नाकारली जाऊ शकत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details