महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यातील आणखी चौघांची कोरोनावर मात, आता केवळ एका रुग्णावर उपचार सुरु - वर्धा कोरोनामुक्तीच्या मार्गावर

आतापर्यंत जिल्ह्यातील 13 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकूण १३ कोरोना रुग्णांपैकी 11 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. जिल्ह्यातील एक रुग्ण रेल्वेत कर्मचारी असल्याने तो नागपूरला गेला असता त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे.

corona patients recovered in wardha
वर्ध्यातील आणखी चौघांची कोरोनावर मात

By

Published : Jun 19, 2020, 7:56 PM IST

वर्धा- जिल्ह्यात शुक्रवारी चार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यात आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथील एकाच कुटुंबातील तिघांचा आणि वर्धा शहरातील रामनगरमधील एकाचा समावेश आहे. या सर्वांना सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अकरा झाली असून सद्यस्थितीत केवळ एक रुग्ण नागपूर येथे उपचार घेत आहे.

आज कोरोनामुक्त झालेल्यांमधील वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथील एक रुग्ण 6 जूनला कोरोनाबाधित आढळला होता. नंतर त्याच्या संपर्कात आलेले घरातील दोन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील रामनगरमधील एक व्यक्ती ८ जूनला कोरोनाबधित असल्याचे समोर आले. या चारही रुग्णांवर सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचार सुरू होते. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सदर रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यामुळे आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार २१९ स्त्राव नमुन्यांची तपासणी झाली आहे. त्यापैकी ३ हजार १६९ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 13 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकूण १३ कोरोना रुग्णांपैकी 11 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. जिल्ह्यातील एक रुग्ण रेल्वेत कर्मचारी असल्याने तो नागपूरला गेला असता त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे.

आजपर्यंत जिल्ह्यात गृह विलगीकरण करण्यात आलेल्यांची संख्या ४९ हजार १५४ असून त्यापैकी ४१ हजार ९५७ लोकांचा गृह विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर सध्या ७ हजार १९७ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. याशिवाय ११२ व्यक्ती हे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन आहेत. आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्तींची संख्या २७ असून आज ७५ लोकांचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठवले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details