महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भरधाव वाहनाच्या धडकेत एका शेतमजूर महिलेचा जागीच मृत्यू, दोघी गंभीर जखमी

शेतातली कामे आटोपून सायंकाळी ३ शेतमजूर महिला घरी जात होत्या. यावेळी नागपूरकडून अमरावतीला भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याकडेला चालणाऱ्या महिलांना चारचाकीने धडक दिली. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून इतर दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.

By

Published : Dec 6, 2019, 11:34 PM IST

wardha
कारच्या धडकेत शेतमजूर महिलेचा मृत्यू, दोघी गंभीर जखमी

वर्धा : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग ६ वरील कारंजा तालुक्यातील ठाणेगावजवळ एका चारचाकीने पायी जाणाऱ्या महिलांना जबर धडक दिली. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. शेतावरील काम संपवून घरी जात असताना या महिलांसोबत ही दुर्दैवी घटना घडली. भाग्यरथी चंपक धुर्वे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अपघातानंतर चालक आणि त्यात बसलेल्यांनी घटनास्थळावरून पळ काढला असल्याचे सांगितले जात आहे.

कारच्या धडकेत शेतमजूर महिलेचा मृत्यू, दोघी गंभीर जखमी

शेतातली कामे आटोपून सायंकाळी ३ शेतमजूर महिला घरी जात होत्या. यावेळी नागपूरकडून अमरावतीला भरधाव जाणाऱ्या चारचाकीचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याकडेला चालणाऱ्या महिलांना चारचाकीने धडक दिली. यामध्ये कार (एमएच २७, व्हीबी ८८५५) ची जोरदार धडक बसल्याने भाग्यरथी धुर्वे या शेतमजूर महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, सोबतच्या सरस्वती गणपत दूधकवळे आणि शालिनी सुनील येडमे (दोघीही राहणार ठाणेगाव) या दोघी गंभीररित्या जखमी झाल्या आहेत.

हेही वाचा - वर्ध्यात एसबीआयचे एटीएम चौथ्यांदा फोडण्याचा प्रयत्न; सीसीटीव्ही बंद, एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर

कारचा अपघात होताच चालक आणि त्यातील काही लोक हे वाहन सोडून घटनास्थळावरून पळून गेल्याचे सांगितले जात आहे. अपघातात जखमी झालेल्या महिलांना कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्रथमोपचार करण्यात आला. कारंजा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे. यात अपघाताच्यावेळी वाहन नेमके कोण चालवत होते, याचा शोध घेणे सुरू आहे.

हेही वाचा - 'भर रस्त्यात शिक्षा दिल्याशिवाय कायद्याची भीती निर्माण होणार नाही'

ABOUT THE AUTHOR

...view details