महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 18, 2020, 8:28 AM IST

ETV Bharat / state

कायदा अमान्य असल्यास आंदोलन करणे हा मूलभूत अधिकार - माजी आयपीएस अधिकारी

वर्धा येथील बाबसाहेब आंबेडकर चौकात आज (सोमवार) पासून 'वर्धा का शाहिनबाग' या नावाने सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोनल सुरू झाले आहे. झालेल्या शाहीन भाग आंदोलनामध्ये अब्दुल रहमान यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नुकताच राजीनामा दिलेले आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे.

ex ips abdul rahma
माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान

वर्धा - नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि नागरिक नोंदणी रजिस्टर (एनआरसी) यामुळे संविधान धोक्यात असून आम्ही त्याविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. आंदोलन करणे हा मूलभूत अधिकार असल्याचे औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायाधीशांनी सांगितले असल्याचे नुकताच राजीनामा दिलेले आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान म्हणाले. ते वर्ध्यातील प्रति शाहीनबाग आंदोलनामध्ये बोलत होते.

कायदा अमान्य असल्यास आंदोलन करणे हा मूलभूत अधिकार - माजी आयपीएस अधिकारी

हेही वाचा -

माझगाव जीएसटी भवनला लागलेली आग आटोक्यात; उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी

वर्धा येथील बाबसाहेब आंबेडकर चौकात आज (सोमवार) पासून सुरू झालेल्या शाहीन भाग आंदोलनामध्ये अब्दुल रहमान यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आम्ही भारताचे नागरिक आहोत, नागरिकत्व हा आमचा अधिकार आहे. या अधिकारावर गदा येत असेल तर आम्ही बाहेर पडलेच पाहिजे. आम्ही नागरिकच नसू तर मग आम्हाला संविधानाचे अधिकारच मिळणार नाही. त्यामुळे जकात हज आणि उमरासाठी लागणारा खर्च आंदोलनासाठी खर्च करावा, असे आवाहन यावेळी रहमान यांनी केले.

सीएए, एनआरसी, एनपीए या कायद्याच्या निषेधात वर्ध्यात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या आंदोलनात मुस्लिम महिला देखील सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी माजी आयपीएस अब्दुल रहमान यांनी मार्गदर्शन केले. यावेळी एनआरसीचा अर्ज कुणीही भरूनच द्यायचा नाही अशी भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. या काळ्या कायद्याच्या निषेधासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करत घटनात्मक विरोध करण्यासाठी सांगण्यात आले.

माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांनी या कायद्याविरोधात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी देशभरात ठिकठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला भेट देत मार्गदर्शन करत आहे. मुंबईच्या एका भागातील आंदोलनात भेटीसाठी गेले असता त्याना १४९ ची नोटीस बजावण्यात आली. वर्ध्यातील सुरू असलेल्या आंदोलनाला 'वर्धा का शाहीन बाग' असे आंदोलनाला नाव देण्यात आले. हे आंदोलन सकाळच्या 8 ते रात्री 8 असे 12 तास धरणे असणार आहे.

हेही वाचा -

वृद्ध महिलेकडून 2 हजारांची लाच घेणाऱ्या खासगी व्यक्तीला एसीबीकडून अटक

ABOUT THE AUTHOR

...view details