महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना लसीकरणासाठी ठाणे पालिका सज्ज; नव्या वर्षात ६ लाख ६० हजार लोकांचे लसीकरण - ठाणे कोरोना लसीकरण

सर्वप्रथम ही लस आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असली तरी ठाणेकर सर्वसामान्य नागरिकांना ही लस पोहोचण्यापर्यंत एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे ठाण्याचे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली.

कोरोना लसीकरणासाठी ठाणे पालिका सज्ज; नव्या वर्षात ६ लाख ६० हजार लोकांचे लसीकरण
कोरोना लसीकरणासाठी ठाणे पालिका सज्ज; नव्या वर्षात ६ लाख ६० हजार लोकांचे लसीकरण

By

Published : Dec 31, 2020, 7:08 PM IST

ठाणे - ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना दिसत असून मृत्यदराचा आकडा कमी होत आहे. 2021 या नवीन वर्षात कोरोनावर लस येणार असल्याने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तयारी देखील करण्यात आली आहे. सर्वप्रथम ही लस आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असली तरी ठाणेकर सर्वसामान्य नागरिकांना ही लस पोहोचण्यापर्यंत एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे ठाण्याचे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली. एकीकडे लसीची तयारी पूर्ण झाली असली तरी मात्र शासनाकडून लसीचा येणाऱ्या साठा बघता सुरवातीला आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना दोन टप्यात देण्यात येणार आहे.

कोरोना लसीकरणासाठी ठाणे पालिका सज्ज; नव्या वर्षात ६ लाख ६० हजार लोकांचे लसीकरण

कोरोनाची लस लवकरच उपलब्ध होणार असून शासनाच्या निर्देशानुसार तसेच वर्गवारीनुसार देण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांपर्यंत लस पोहचण्यासाठी तब्बल एक वर्षाचा कालावधी लागू शकतो, असे शर्मा यांनी सांगितले. लस आली की ती सर्वप्रथम आरोग्य सेवेतील सुमारे 6 लाख 60 हजार कर्मचाऱ्यांना ही लस देण्याची तयारी करण्यात आली असून दोन टप्यात ही लस देणार असल्याचे ठाणे महापलिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बोलताना सांगितले.

६ लाख ६० हजार लाभार्थ्यांचे दोन वेळा लसीकरण होणार आहे. म्हणजे १३ लाख २० हजार लसीकरणाचे मोठे आव्हान आहे. त्यातही एकाही लाभार्थ्याचे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण चुकता कामा नये याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर लसीचा साठा येईल तसे वर्गवारी करून नागरिकांना लस देण्यात येणार असल्याचे आयुक्त विपीन शर्मा यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींना करावी लागणार लसीची प्रतीक्षा -

कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधीनीदेखील रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावले होते. याच काळात ठाण्यातील अनेक लोकप्रतिनिधींना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सर्वप्रथम आवाज उठवत लोकप्रतिनिधींनादेखील क्रमांकाने लस द्यावी अशी मागणी केली होती, मात्र त्यांनादेखील प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details