महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे जिल्ह्यात अशीही परंपरा; गुरांना पेटत्या आगीवरून नेत शेतकऱ्यांची दिवाळी - Thane district old tradations

यंदाच्या दिवाळीत कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे पेटत्या आगीची पूजा करून देशावरील कोरोनाचा संकट लवकर टळू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे, ईडा पिडा टळो व बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना करण्यात आली.

गुरांना पेटत्या आगीवरून नेताना शेतकरी
गुरांना पेटत्या आगीवरून नेताना शेतकरी

By

Published : Nov 16, 2020, 5:24 PM IST

Updated : Nov 16, 2020, 5:38 PM IST

ठाणे - जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात बळीप्रतिपदेला भाताची मळणी झाल्यावर भाताच्या पेंड्याला गावातल्या चावडीवर असलेल्या मुख्य रस्त्यावर पेटवण्यात येते. हा पेंडा पेटवल्यानंतर त्यातून निघणाऱ्या धुरातून व आगीच्या ज्वालांमधून गावात असणारी सगळी गुरे एका बाजूकडून दुसरीकडे पेटत्या आगीवरून नेली जातात. विशेष म्हणजे ही प्रथा आजही जिल्ह्यातील ग्रामीण भागात गावोगावी शेतकरी दिवाळीत पाळत असल्याचे दिसते.

बळीप्रतिपदेच्या दिवशी गुरांना सजविण्याची परंपरा
बळीप्रतिपदेच्या दिवशी पहाटे लवकर उठून किंवा आदल्या दिवशीच शेतकऱ्यांच्या घरोघरी असलेल्या बैलांना स्वच्छ आंघोळ घातली जाते. त्यांच्या शिंगांना तासून रंग किंवा तेल लावून चमकावले जाते. बैलांच्या शिंगांना फुगे बांधून, त्यांच्या अंगावर गेरू आणि पांढऱ्या रंगाचे हाताच्या पंजाने ठसे उमटवले जातात. त्यांच्या अंगावर झालर वगैरे टाकून चांगल्या पद्धतीने सजवले जाते. बैलांच्या गळ्यात घुंगरू बांधून हार घालून त्यांच्यावर गुलाल उधळला जातो. यंदाच्या दिवाळीत कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे पेटत्या आगीची पूजा करून देशावरील कोरोनाचा संकट लवकर टळू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे, ईडा पिडा टळो व बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना करण्यात आली. जिल्ह्यातील आगरी, कोळी, कुणबी शेतकरी गुरांना पूज्यनीय मानून शेतात राबतात. शेतकऱ्यांची बहुतांश कामे दिवाळीत आटोपतात. कृतज्ञता म्हणून दिवाळीत गुरांचा खास सण साजरा करतात.

ठाणे जिल्ह्यात अशीही परंपरा



शेतकऱ्यांची हायटेक शिक्षण घेणारे मुलेही या प्रथेचे करतात सर्मथन
शेतकऱ्यांची हायटेक शिक्षण घेणारे मुलांच्या मते बऱ्याच वेळा गुरांच्या अंगाला पिसवा, गोचिड चिटकलेले असतात. त्यामुळे पेंढ्याची आग करून त्यावरून गुरांना नेले जाते. ही आग पेंढ्याची असल्याने सौम्य असते. लाकडासारखे निखारे या आगीत नसतात. या शेकोटीवरून गुरांना उडवून नेल्यावर त्यांच्या अंगावरील जंतू धुरामुळे गळून पडतात. नष्ट होतात. आगीचे भय गुरांना राहत नाही. यदाकदाचित रानात वणवा पेटल्यास गुरे सैरभैर होत नाहीत. गावातील जाणकार माणसे मदतीला सतर्क असतात. तर हिवाळ्याच्या दिवसात आगीवरून गुरे उडवून त्यांना उबदार शेक मिळवून देण्याची पारंपारीक पध्दत शास्त्रीयदृष्ट्या योग्यच आहे. तथाकथीत प्राणी मित्रांनी काळजी करण्यासारखे काहीच कारण नसल्याचे सांगत त्यांनी प्रथेचे सर्मथन केले.

Last Updated : Nov 16, 2020, 5:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details