मीरा भाईंदर(ठाणे) - व्यापाऱ्यांच्या अनेक दिवसांच्या मागणीनंतर अखेर मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून शहरातील दुकाने 17 ऑगस्टपासून नियमित सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळेच शहरातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळला आहे.
टाळेबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. मागील पाच महिन्यांपासून बंद असलेल्या व्यापारी वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे, तर काही दुकानदार भाडेतत्त्वावर असल्यामुळे चार ते पाच महिन्यांचे भाडे थकले आहेत. मिशन बिगिन अगेननंतर सम व विषम पद्धतीने दुकाने सुरू करण्यात आली. मात्र, या निर्णयाला दुकानदारांनी व व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.