ठाणे - डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर बाजूकडील रेल्वे प्रवेशद्वार अडवून भर रस्त्यात रिक्षा उभ्या करून प्रवाशी वाहतूक करणाऱ्या ४५ बेशिस्त रिक्षा चालकांवर वाहतूक विभागाच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, चारही बाजूंनी वाहतूक पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत अडकल्याने त्यांना पळता आले नाही. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक पोलिसांचे कौतुक केले.
या ४५ बेशिस्त रिक्षा चालकांना विष्णुनगर वाहतूक विभागात हजर करून प्रत्येकाकडून बाराशे ते चौदाशे रुपये दंड वसूल करण्यात आला. तर, १५ रिक्षाचालकांना नोटिसा देऊन जप्तीची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती डोंबिवली वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे यांनी दिली. वाहनतळ सोडून प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर दररोज कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा -न्यायमूर्ती पुष्पा गनेदीवाला यांना हटवा, राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेतीची मागणी
बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडी
मागील दोन वर्षापासून डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर बाजूकडील रेल्वे प्रवेशद्वाराच्या तोंडावर भर रस्त्यात गरीबाचा पाडा, नवापाडा, कुंभारखाण पाडा, राजूनगर, गणेशनगर भागात राहणारे स्थानिक भूमिपत्र असलेले रिक्षाचालक रिक्षा उभ्या करतात. त्या ठिकाणाहून प्रवासी वाहतूक करतात. रस्त्यात आणि रेल्वे प्रवेशद्वारावर रिक्षा उभ्या केल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा येतो. या भागात वाहतूक कोंडी होते. फलाटावर जाणाऱ्या प्रवाशांना वाट शोधत जावे लागते. सकाळ, संध्याकाळच्या वेळेत आणि वाहतूक पोलीस या ठिकाणी तैनात नसला की, त्याचा पुरेपूर गैरफायदा हे रिक्षा चालक घेतात. रिक्षा चाहनतळावर रिक्षा उभी करून प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या चालकांवर हे बेशिस्त रिक्षा चालक अन्याय करतात. नोकरी, व्यवसाय नसलेले स्वतःचा रिक्षा परवाना, बिल्ला नसलेले हे रिक्षा चालक मूळ रिक्षा चालकाची रिक्षा भाड्याने चालवण्यासाठी घेतात.
दोन दिवसापूर्वी महिला वाहतूक सेवकाला मारहाण