महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 15, 2019, 11:42 PM IST

Updated : Oct 15, 2019, 11:51 PM IST

ETV Bharat / state

आरएसएसच्या नथीतून 'राज' चे भाजपच्या राजमंत्र्यावर टीकास्त्र

कल्याण ग्रामीणसाठी प्रमोद तथा राजू पाटील आणि डोंबिवलीतून मंदार हळबे मतदारसंघात निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ध.ना. चौधरी मैदानात जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी भाजप- काँग्रेसचा सडकून समाचार घेतला.

राज ठाकरे

ठाणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डोंबिवलीत निवडून देणारे हे कुठे आणि डॉ. हेगडेवार कुठे, अशी तुलना करीत आरएसएसच्या नथीतून राज ठाकरेंनी भाजपचे राजमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर डोंबिवलीच्या जाहीर सभेत टीकास्त्र सोडले.

कल्याण ग्रामीणसाठी प्रमोद तथा राजू पाटील आणि डोंबिवलीतून मंदार हळबे मतदारसंघात निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ध.ना. चौधरी मैदानात जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी भाजप- काँग्रेसचा सडकून समाचार घेतला.

राज ठाकरे

हेही वाचा - ..तर देशभरातील लाखो यंत्रमाग कारखाने बंद पडतील- असदुद्दीन ओवैसी
डोंबिवलीची ओळख सुशिक्षितांची नगरी म्हणून केली जाते. सर्वात जास्त चार्टर्ड अकाऊंटंट डोंबिवलीतून बाहेर पडतात. मात्र, या डोंबिवलीची ओळख आज बकाल शहर म्हणून झाली आहे. त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात, असा आरोप राज ठाकरेंनी केला. ते म्हणाले, 12 मे 2019 रोजी राष्ट्रीय पातळीवरील कॅरमपटू जान्हवी मोरे हिचा खड्ड्यांनी बळी घेतला. अशा अनेकांचा या खड्डयांनीच बळी गेल्याचा ठाकरे यांनी पाढाच वाचून दाखवला. देवेंद्र फडणवीस यांनी याच डोंबिवलीत येऊन 6500 कोटी रुपयांची घोषणा केली. मात्र, एक छदामही दिला नाही. तो भाग वेगळाच, पण आपण ज्याला दोनदा निवडून दिले त्याला जाब विचारण्याची आपल्यात हिंमत का होत नाही? असाही सवाल ठाकरेंनी उपस्थितांशी बोलताना विचारला.
उत्तर भारतातून येणारे लोंढे यहा भी तो ऐसाही लागता है, असे बोलतात तेव्हा महाराष्ट्राची हिच ओळख आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. भारतात सर्वाधिक लोंढे केवळ ठाणे, कल्याण, भिवंडी, डोंबिवलीत येत असतात. असे सांगून बाहेरचे लोंढे थांबवा, असे आम्ही सतत ओरडत आलो. मात्र, आमच्या बोलण्याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे याच लोंढ्यानी शहरे बकाल केली असा आरोप ठाकरेंनी यावेळी केला.

हेही वाचा - दुरुस्तीवर लाखोंचा निधी खर्च; तरी केडीएमटीला प्रवाशांचा दे धक्का!
ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी वांझोटा कारभार केला, त्यांचा महाराष्ट्रासाठी काहीही उपयोग झाला नाही. त्यानंतर सुशिक्षित आणि तरुण मुख्यमंत्री फडणवीस आले. लोकांनी बहुमत देऊनही ते सर्वत्र खोटे बोलत सुटले आहेत. सव्वा लाख विहिरी आमच्या सरकारने खोदल्या असे ते म्हणतात मात्र, रस्त्यात पडलेल्या सव्वा लाख खड्ड्यांबद्दल तुम्ही बोलत का नाहीत, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. इतक्या वर्षात थापा मारणाऱ्या या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची आता वेळ आली आहे. परकीयांची दादागिरी तुम्ही येथे सहन करता, पण बाकीच्या राज्यांत त्यांचे कौतुक केले जाते. याचेच उदाहरण म्हणजे, पश्चिम बंगाल मधील मंत्रालयात असलेल्या लिफ्टमध्ये बंगाली भाषेत किशोर कुमार यांची गाणी ऐकायला मिळतात. मात्र, महाराष्ट्राच्या मंत्रालयात लावलेल्या लिफ्टमध्ये लता-आशा यांची गाणी ऐकायला मिळत नाहीत. असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त करत राज्य सरकारच्या कारभारावर जळजळीत टिका केली.

हेही वाचा - शिवेंद्रसिंहराजे साताऱ्यातील मतदारांच्या भेटीसाठी ठाण्यात
आता भाकरी करपण्याची वाट बघत बसू नका, ती परतून टाका, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. तसेच निवडणूक म्हणजे थट्टा समजू नका, सक्षम-प्रबळ विरोधी पक्षासाठी आम्ही जाब विचारण्यासाठी निवडणूकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे माझा आमदार असला तरी त्याच्यावर माझेच लक्ष राहणार असल्याची ग्वाही ठाकरे यांनी शेवटी बोलताना दिली.

हेही वाचा - वडिलांच्या मदतीला लेक आली धावून; नताशा आव्हाडची प्रचारात उडी

Last Updated : Oct 15, 2019, 11:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details