महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 13, 2019, 9:40 AM IST

ETV Bharat / state

इतर पक्ष बंडखोरीने पोखरले, आपलं मात्र ठणठणीत चाललयं - राज ठाकरे

जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात युतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे म्हणाले, बाकीचे राजकीय पक्ष बंडखोरीने पोखरले, आपलं मात्र ठणठणीत चाललयं. मनसेच्या कल्याण डोंबिवलीतील उमेदवारांसाठी कल्याणच्या फडके मैदानात प्रचारसभा आयोजीत करण्यात आली होती.

राज ठाकरे

ठाणे -जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात युतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे म्हणाले, बाकीचे राजकीय पक्ष बंडखोरीने पोखरले, आपलं मात्र ठणठणीत चाललयं. मनसेच्या कल्याण डोंबिवलीतील उमेदवारांसाठी कल्याणच्या फडके मैदानात प्रचारसभा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी राज ठाकरेंनी विशेषतः भाजप शिवसेनेमधील नगरसेवकांसह आमदाराने बंडखोरी करत राजीनामे दिल्याबाबत सेना भाजपच्या स्थानिक नेत्यावर निशाणा साधला.

राज ठाकरे कल्याणमधील प्रचारसभेत बोलताना

हेही वाचा - 'कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र?'

राज ठाकरेंनी आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्र्यावर ही तोफ डागली. ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कल्याण-डोंबिवलीसाठी जाहीर केलेल्या ६५ हजार कोटी रुपयांच्या घोषणेचे काय झाले? असा सवाल विचारत त्यांच्या घोषणा म्हणजे केवळ थापा असल्याचा टोलाही लगावला. तर परप्रांतीयांविरोधात गुजरातमध्ये आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला भाजपमध्ये सन्मानपूर्वक प्रवेश दिला जातो.

महाराष्ट्रात याच मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या आपल्या मनसैनिकांवर शेकडो केसेस ठोकल्या जातात. आपण एकही आंदोलन अर्धवट सोडलेले नाही. आपल्यामुळेच राज्यातील ७८ टोल नाकेबंद झाले. मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळवून दिल्या. मोबाईल वर ऐकू येणारे मराठी हेदेखील मनसेच्या दणक्यामुळे झाल्याचे राज म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरेंनी आपल्या पाऊण तासाच्या भाषणात केंद्र सरकार, राज्य सरकार यांची धोरणे, नोटबंदी, मिडीया विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपमध्ये झालेली बंडखोरी आधी मुद्द्यावर सडकून टीका केली.

हेही वाचा - राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५१ व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ

ABOUT THE AUTHOR

...view details