ठाणे -लोकनेते स्वर्गीय दि.बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, यासाठी सर्वच स्तरावर बैठका झाल्या. ठाणे–रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्रांची मागणी होत असतानाच आज (गुरूवार) सिडको भावनांवर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. याच मागणीसाठी रिपाई आठवले गटाच्या शेकडो कार्यकत्यांनी मोर्च्यात सहभागी होत असल्याची माहिती भिवंडी तालुका अध्यक्ष भरत जाधव यांनी दिली आहे.
कोरोना काळात कायद्याचे उल्लंघन होऊ नये आणि कुठेही गालबोट लागू नये. यासाठी पोलिसांनी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कॉम्रेड काळू कोमास्कर, काँग्रेस पदाधिकारी संतोष केणे, संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार यांसह ७० जणांना १४९ कलमानव्ये नोटिसा बजावल्या आहेत. कोरोना काळात इतक्या मोठ्या संख्यने जमा होऊ नये. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे यांनी दिली.
आंदोलनकर्ते खाजगी वाहनांने सिडकोकडे रवाना -