महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर : साधुंच्या हत्या प्रकरणात ८९ जणांना जामीन मंजूर; ठाणे न्यायालयाचा निर्णय - पालघर जमावबळी प्रकरण अपडेट

या प्रकरणी आज ठाण्याच्या न्यायालयाने ८९ जणांना जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी १५ हजार रुपयांचा जातमुचलक्यावर या ८९ जणांना जामीन दिला. घटना घडली त्यावेळी घटनास्थळी हे ८९ जण केवळ उपस्थित होते, असे म्हणून न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

पालघर
पालघर

By

Published : Jan 16, 2021, 4:20 PM IST

Updated : Jan 16, 2021, 9:53 PM IST

पालघर- जिल्ह्यातील गडचिंचले येथे जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. या प्रकरणी आज ठाण्याच्या न्यायालयाने ८९ जणांना जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर या ८९ जणांना जामीन दिला. घटना घडली त्यावेळी घटनास्थळी हे ८९ जण केवळ उपस्थित होते, असे म्हणून न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

पालघर

16 एप्रिल रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. तिहेरी हत्या प्रकरणात 165 आरोपींना अटक करण्यात आली यातील 11 जण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बाल सुधारगृहात करण्यात आली होती. तिहेरी हत्याप्रकरण देशभर चर्चेचा मुद्दा बनला. हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानंतर गडचिंचले तिहेरी हत्याकांडाचा तपास सीआयडीमार्फत करण्यात आला.

या प्रकरणी महाराष्ट्र सीआयडीने डहाणू न्यायालयात ११ हजार पानांची २ स्वतंत्र आरोपपत्र दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी ठाणे न्यायालयाने याच प्रकरणातील ४७ जणांना जामीन मंजूर केला होता. आतापर्यंत या प्रकरणात २४८ जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी १९४ जणांना जामीन देण्यात आला आहे.

Last Updated : Jan 16, 2021, 9:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details