महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 11, 2023, 3:53 PM IST

ETV Bharat / state

Explosion Electric Motor : केमिकल ड्रमने भरलेल्या ट्रकला भीषण आग; तर विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन एक ठार, दोन जखमी

काल रात्री भिवंडीत केमिकलने भरलेल्या ट्रकला आग लागून संपूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे. तसेच कल्याण शीळ मार्गावरील दिवा गावात टोरंट कंपनीच्या इलेक्ट्रिक मोटारीचा स्फोट होऊन एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

An Explosion Electric Motor
An Explosion Electric Motor

केमिकल ड्रमने भरलेल्या ट्रकला भीषण आग

ठाणे : जिल्ह्यात आगीचे सत्र सुरु असून काल रात्रीच्या सुमारास भिवंडीत केमिकल ड्रमने भरलेल्या ट्रकला भीषण आग लागून संपूर्ण ट्रक जळून खाक झाल्याची घटना घडली. तसेच कल्याण शीळ मार्गावरील दिवा गावात टोरंट कंपनीच्या विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन एक जण ठार झाला, तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

विद्युत रोहित्राचा स्फोट :विशेष म्हणजे विद्युत रोहित्राचा स्फोट झाला. त्यावेळची स्फोटची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. तर, रोहित्राचा स्फोट होऊन भूमिगत विद्युत वाहिन्यांना काही क्षणातच आग लागल्याने मोठं मोठ्या आगीच्या ज्वाला बाहेर येत होत्या, तर या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला १० ते १२ तास अथक परिश्रम करावे लागले. दुसरीकडे ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी भारत पेट्रोलियमची भूमिगत पाईप लाईनला आगीची झळ लागल्याचे बोलले जात आहे. या आगीत विशाल सिंह (३५) याचा होरपळून मृत्यू झाला. तर आणखी २ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

केमिकल ड्रमने भरलेल्या ट्रकला आग : भिवंडी तालुक्यातील दापोडे ग्रामपंचायत हद्दीत केमिकल ड्रमने भरलेल्या एका ट्रकमध्ये पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली होती. आग लागल्याचे समजतात चालकाने ट्रकमधून उडी मारल्याने त्याचा जीव बचावला. मात्र, काही क्षणातच ही आग इतकी मोठी आणि भीषण झाली की यामध्ये केमिकल ड्रमचे मोठमोठे स्फोट होऊन भीषण आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुसरीकडे स्फोटामुळे ट्रकमधून हवेत उडणारे ड्रम परिसरात कोसळत होते. हे ड्रम एका चायनीजच्या दुकानात येऊन पडल्याने दुकानाचेही नुकसान झाले आहे.

पाच तासांनी आगीवर नियंत्रण : केमिकल ड्रम ने भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याचे समजतात घटनास्थळी नारपोली पोलीस दाखल झाली. अग्निशमन दलाला प्रचारण करण्यात आले. मात्र काही वेळातच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या रस्त्यावरील दोन्ही बाजूने वहातुक थांबवण्यात आली होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न करून तब्बल पाच तासांनी भीषण आग नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले आहे.

आगीमुळे मार्गावर वाहतूक कोंडी :कल्याण - शीळ मार्गवरील दिवा गावात शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता टोरंट कंपनीच्या विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन भूमिगत विद्युत वाहिन्यांनाही काही क्षणात भीषण आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी १० ते १२ तास अग्निशमन दलाच्या जवानांना अथक प्रयत्न करावे लागले. तर आगीच्या घटनेमुळे कल्याण शीळ मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. शिवाय आगीमुळे विद्युत वाहिन्यांही जळून खाक झाल्याने परिसरातील बहुतांश गावाचा वीज पुरवठा खंडित झाला होता.

हेही वाचा -Kolhapur Crime : बेरोजगारांना नोकरीचे आमीष दाखवून कोट्यवधी रूपये उकळले, चक्क महापालिका आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर

ABOUT THE AUTHOR

...view details