महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Illegal Schools : जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघात सर्वाधिक अवैध शाळा; कारवाईचा शाळांना इशारा - जितेंद्र आव्हाड मतदारसंघ अवैध शाळा

ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने ४७ बोगस शाळांची यादीच जाहिर केली. या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश न घेण्याचे आवाहन केले आहे. अवैधरित्या सुरू असलेल्या या बोगस शाळांविरोधात दंडात्मक कारवाई करणार असल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मतदार संघ असलेल्या कळवा-मुंब्रा परिसरात सर्वाधिक शाळा बोगस असल्याचे समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jun 25, 2023, 3:00 PM IST

Updated : Jun 25, 2023, 3:29 PM IST

प्रतिक्रिया देताना माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्या

ठाणे - ४७ बोगस शाळा ठाणे महापालिकेच्या रडारवर आल्या आहेत. ठाणे मनपा क्षेत्रात इंग्रजी माध्यमाच्या ४२, मराठी माध्यमाच्या २ आणि हिंदी माध्यमाच्या ३ शाळा अनधिकृत आहेत. या अनधिकृत शाळां विरुद्ध महापालिकेच्या शिक्षण विभागाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १८ नुसार दंडात्मक कारवाई करण्याचे जाहिर केले आहे. या बोगस शाळांमध्ये राबोडी, मानपाडा, डायघर गाव, सुभाषनगर आणि ढोकाळी येथील प्रत्येकी एक शाळा असुन दिवा भागात सर्वाधिक अनधिकृत शाळा आहेत. दरम्यान, या पाहणीत १२ बोगस शाळा आव्हाडांच्या कळवा - मुंब्रा परिसरातील असल्याचे समोर आले आहे.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा -आता उन्हाळ्याच्या सुट्टया संपल्याने पालिकेने अनधिकृत शाळांना दिलेल्या नोटीसांमुळे जर त्या शाळा बंद झाल्या तर त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा शाळांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात अशा बेकायदेशीरपणे शाळा उभ्या कशा राहतात याकडे आमदारांनी देखील लक्ष देणं तेवढंच गरजेचं असल्याचं शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर भगत यांनी सांगितले आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात अशा बेकायदेशीरपणे शाळा उभ्या कशा राहतात याकडे आमदारांनी देखील लक्ष देणं तेवढंच गरजेचे आहे - शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर भगत

महापालिका प्रशासनाची डोळेझाक आणि बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे - सामाजिक कार्यकर्त्या डॉ.मर्जीया पठाण

पालिका प्रशासन करते तरी काय - एवढ्या मोठ्या प्रमाणात कळवा मुंब्र्यात अशा बेकायदेशीर शाळा सुरू होत असताना पालिका प्रशासन काय करत होते? तसंच पालकांना आपल्या मुलांना मोठमोठ्या शाळांची फी न परवडत असल्याने त्यांना नाईलाजाने अशा शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. शाळा सुरू झाल्या असताना महापालिका प्रशासनाने धाडलेल्या नोटिसा या चुकीच्या आहेत. महापालिका प्रशासनाची डोळेझाक आणि बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे मुंब्रातील सामाजिक कार्यकर्त्या डॉ.मर्जीया पठाण यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -

  1. Nashik News : धक्कादायक ! खाजगी वसतिगृहातील विद्यार्थिनींना पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचवले
  2. Wold Best School : जगातील शाळांच्या श्रेणीत महाराष्ट्राच्या तीन शाळा, नगरची एक मुंबईच्या दोन शाळांचा समावेश
Last Updated : Jun 25, 2023, 3:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details