महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Life Imprisonment For Murdering Brother : भावाचा खून करून मृतदेहाचे केले तुकडे, कोर्टाने दिली जन्मठेपेची शिक्षा - खून करुन शरीराचे केले तुकडे

ठाण्यात भावानेच भावाची हत्या केल्याचे प्रकरण शिक्षेपर्यंत पोहोचले आहे. जिल्ह्यात 2018 मध्ये भावानेच भावाचा खून केला. त्याचे तुकडेही केले होते. यातील दोषी भावाला आता जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे.

Life Imprisonment For Murdering Brother
Life Imprisonment For Murdering Brother

By

Published : Apr 5, 2023, 3:02 PM IST

ठाणे -ठाणे जिल्हा न्यायालयाने बुधवारी एका 34 वर्षीय व्यक्तीला 2018 मध्ये आपल्या भावाची निर्घृण हत्या आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे केल्याप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश रचना तेहरा यांनी दोषी सायमन पत्रावला सात हजार रुपयांचा दंडही ठोठावला. फिर्यादीने आरोपीवरील सर्व आरोप सिद्ध केले असून त्याला दोषी ठरवून शिक्षा देण्याची गरज असल्याचे न्यायाधीशांनी नमूद केले.

दोन भावांची सततची भांडणे - अतिरिक्त सरकारी वकील ई बी धमाल यांनी न्यायालयाला सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथील सायमन पात्रव हा बेकार होता आणि त्याचा मोठा भाऊ विल्फ्रेड पत्राव (३५) याच्याशी आर्थिक मुद्द्यावरून भांडण होत असे. वेगवेगळ्या कारणावरुन त्यांची भांडणे होत असत. त्यावरुन त्यांच्यात मोठी वादावादीही झालेली आहे. कधी - कधी प्रकरण हाणामारीपर्यंतही पोहोचत होते.

खून करुन शरीराचे केले तुकडे - सायमनने एटीएममधून 20,000 रुपये काढल्यानंतर 3 आणि 4 एप्रिल 2018 च्या मध्यरात्री भावांमध्ये भांडण झाले, असे फिर्यादीने सांगितले. रागाच्या भरात सायमनने चाकूने विल्फ्रेडचा खून केला. त्याने शरीराचे तुकडे केले आणि त्याचे भाग प्लास्टिकच्या पिशवीत भरले. ही प्लास्टीकची पिशवी त्याने घराबाहेर पडण्यापूर्वी त्याच्या घराच्या बाथरूममध्ये टाकली, असे कोर्टाला सांगण्यात आले. आरोपीने नंतर त्याच्या दुसऱ्या भावाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्याने ही माहिती पोलिसांना दिली.

कोर्टाने दिली जन्मठेपेची शिक्षा - हा माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सायमनला अटक करण्यात आली. त्याच्यावर खून आणि पुरावे गायब केल्याच्या आरोपाखाली खटला चालवला गेला. खटल्यादरम्यान फिर्यादी पक्षाने १७ साक्षीदार तपासले, असे वकील धमाल यांनी सांगितले. ठाण्यात गुन्हे नोंदीचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. त्यामध्ये गंभीर गुन्ह्यांचे प्रमाणही मोठे आहे. मात्र पोलीस तातडीने कारवाई करत असल्याचे दिसत आहे. आता या निकालाने त्याची प्रचिती येत आहे. गुन्हेगारांना वेळीच शिक्षा मिळाली तर त्याचा उपयोग गुन्हे नियंत्रणासाठी होईल अशी आशा आहे. पोलिसांनीही तातडीने कारवाई केल्याने गुन्हेगारांच्यावर वचक बसण्यास मदत होत आहे.

हेही वाचा - Ahmednagar Crime News: अहमदनगरमध्ये समाजकंटकांकडून पुन्हा दगडफेक; दोन गटात राडा, दोन मोटरसायकल जाळल्या

ABOUT THE AUTHOR

...view details