महाराष्ट्र

maharashtra

मनसेच्या आंदोलनाला यश, लोकल ट्रेन ऐरोली स्थानकात थांबण्यास सुरुवात

By

Published : Oct 10, 2020, 3:41 PM IST

Updated : Oct 10, 2020, 4:06 PM IST

आजपासून (१० ऑक्टोबर २०२०) ठाणे ते पनवेल धावणाऱ्या रेल्वे ऐरोली स्टेशनवर थांबण्यास सुरवात झाली. आज सकाळी ८.४०. वा. ठाणे वाशी आणि ठाणे पनवेल रेल्वे थांबली. यावेळीनिलेश बाणखेले यांनी रेल्वे चालकाचा सत्कार करत रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. या वेळी बाळासाहेब शिंदे, विश्वनाथ दळवी, सुनील पगार, भूषण आगीवले, संदीप सिंग, दशरथ सुरवसे, प्रवीण घोगरे पाटील, संतोष जाधव, निखिल थोरात सोबत इतर मनसे सैनिक उपस्थित होते.

local train started stopping at airoli station is success of mns movement
मनसेच्या आंदोलनाला यश, लोकल ट्रेन ऐरोली स्थानकात थांबण्यास सुरुवात

नवी मुंबई -ठाणे ते पनवेल धावणाऱ्या लोकल सेवा सुरू आहेत. परंतु, या लोकल ट्रेन ऐरोली रेल्वे स्टेशनवर थांबत नव्हत्या. या संदर्भात नवी मुंबई उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली स्थानकात धरणे आंदोलन करून रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. ठाण्याचे खासदार राजन विचारे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध घोषणाबाजीही करण्यात आली होती. मनसेच्या या आंदोलनाला यश आले असून, ऐरोली स्थानकात आज 10 ऑक्टोबर पासून लोकल थांबण्यास सुरवात झाली आहे.

मनसेच्या आंदोलनाला यश, लोकल ट्रेन ऐरोली स्थानकात थांबण्यास सुरुवात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या कित्येक महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेन बंद आहेत. अनलॉक जाहीर केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक ऑफिसमध्ये जात आहेत. लोकल ट्रेन सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवनवाहिनी आहे. ट्रेन बंद असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मनसेच्या माध्यमातून सविनय कायदेभंग आंदोलन पुकारत लोकलमधून प्रवास करत रेल्वे प्रशासनाचा निषेध केला होता. नवी मुंबई मनसेचे मनसैनिक रस्त्यावर उतरले होते व त्यांनी धरणे आंदोलन करून रेल्वेच्या सर्व लोकल ट्रेन ऐरोली रेल्वे स्थानकावर थांबल्या पाहिजे. या विषयावर निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर, ऐरोली रेल्वे स्थानक परिसरात खासदार राजन विचारे आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निदर्शनेही केली होती.

पुढील 15 दिवसात रेल्वे ऐरोली स्थानकावर थांबल्या नाही तर, रेल रोको आंदोलनाचा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला होता. त्यानंतर आजपासून (१० ऑक्टोबर २०२०) ठाणे ते पनवेल धावणाऱ्या रेल्वे ऐरोली स्टेशनवर थांबण्यास सुरवात झाली. आज सकाळी ८.४०. वा. ठाणे वाशी आणि ठाणे पनवेल रेल्वे थांबली. यावेळी
निलेश बाणखेले यांनी रेल्वे चालकाचा सत्कार करत रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. या वेळी बाळासाहेब शिंदे, विश्वनाथ दळवी, सुनील पगार, भूषण आगीवले, संदीप सिंग, दशरथ सुरवसे, प्रवीण घोगरे पाटील, संतोष जाधव, निखिल थोरात सोबत इतर मनसे सैनिक उपस्थित होते.

Last Updated : Oct 10, 2020, 4:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details