ठाणे -गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत भारताच्या सर्व भागात 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन मोठ्या भक्ती-भावात झाले. त्यातच भिवंडी महापालिकेअंतर्गत 10 गणेश घाट येत असून या गणेश घाटांवर असलेले जीवन रक्षक यांना पालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली जात नसल्याने जीवन रक्षकांसह सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ नाराज असल्याचे दिसून आले आहे.
आज दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जन वेळी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकाऱ्यांनी गेल्या 10 वर्षांपासून जीवनरक्षकांच्या रक्षणासाठी लाईफ जॅकेट तसेच त्याचे विमा योजना काढण्याची मागणी सातत्याने करत आहेत. परंतु पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. जर या जीवन रक्षकांना काही झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर दुसरीकडे आज दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होत आहे. परंतु पालिका प्रशासनाला शहरातील खड्डे दिसत नाहीत. येत्या दोन दिवसात शहरातील खड्डे बुजवले नाहीत. तर 5 व 10 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होऊ देणार नसल्याचे सांगत मोठा आंदोलन छेडण्याचा इशारा सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने देण्यात आला आहे.
हे ही वाचा -Mumbai Rape Case : साकीनाका बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशीच झाली पाहिजे - देवेंद्र फडणवीस