महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेच्या राज्यात गुंडांच्या मिरवणुका निघतात, नारायण राणेंचा घणाघात - Goons march in Shiv Sena's state

भाजपा नेते नारायण राणे यांनी पुन्हा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले. शिवसेनेच्या राज्यात गुंडांच्या मिरवणुका निघतात मात्र साधुसंतांनी शिवजयंती मिरवणूक निर्बंध येतात, असा टोला नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला.

शिवसेनेच्या राज्यात गुंडांच्या मिरवणुका निघतात
शिवसेनेच्या राज्यात गुंडांच्या मिरवणुका निघतात

By

Published : Feb 16, 2021, 9:25 PM IST

ठाणे - भाजपा नेते नारायण राणे यांनी पुन्हा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले. शिवसेनेच्या राज्यात गुंडांच्या मिरवणुका निघतात मात्र साधुसंतांनी शिवजयंती मिरवणूक निर्बंध येतात, असा टोला नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला. आगामी अर्थसंकल्पीय बजेटसाठी मुख्यमंत्री पिंजर्‍यातून बाहेर पडणार का, असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांना केला आहे.

शिवसेनेच्या राज्यात गुंडांच्या मिरवणुका निघतात
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय बजेटची माहिती देण्यासाठी ठाण्यामध्ये भाजपचे नेते नारायण राणे आले होते. त्यांनी बजेटबाबत केंद्र सरकारच्या धोरणांचे स्वागत करत हे बजेट भारताला महासत्ता बनवण्यासाठी उपयुक्त असे बजेट असल्याचे सांगितले. राज्याच्या राजकारणात सध्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गाजत असताना संजय राठोड यांच्यावर या संदर्भात आरोप होत आहेत. यावेळी राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाकडून होते यावर शिवसेनेकडून कोणतेही उत्तर न मिळाल्याने शिवसेना मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा देणार नाही जर त्यांचा राजीनामा घेतला तर सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणातही राजीनामा द्यावा लागेल असे आदित्य ठाकरेंचे नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला.


महाविकास आघाडीच्या काळात महिला सुरक्षित नसून ठाकरे सरकार महिला सुरक्षिततेच्या बाबतीत कोणताच पाऊल उचलत नसल्याचा देखील आरोप नारायण राणे यांनी केला. शिवसेना सरकारमधील मंत्री हे खोटारडे असल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला. तीन पक्षांचा सरकार हे आपल्या निर्णयावर ठाम राहू शकत नाही. त्यामुळेच त्यांना वारंवार घुमजाव करावा लागत असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली.

अधिवेशन आले की कोरोना वाढतो
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळ असताना राज्य सरकारसमोर असलेल्या अडचणी समोर येऊ नये म्हणून अधिवेशन गुंडाळण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असते. म्हणूनच कोरोना वाढला असे राज्याचे नेते मंत्री सांगत असतात आणि यानिमित्ताने अधिवेशन गुंडाळण्याचा आरोप सरकार करत असल्याचा उल्लेख नारायण राणे यांनी केला.

हेही वाचा -दीराला खांद्यावर बसवून गर्भवती महिलेला करायला लावली ३ किमीची पायपीट, बॅटने केली मारहाण

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details