महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आता तरी मंत्रीमंडळ विस्तार करा'; फडणवीसांची बदलापूरमधून टोलेबाजी - devendra fadnavis news

विरोधाभासातून एकत्र येत सत्ता मिळवली आहे, तर सरकार व्यवस्थित  चालवा, असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'अटलसंध्या' कार्यक्रमात त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

devendra fadanvis speaks about mahavikas aghadi
'आता तरी मंत्रिमंडळ विस्तार करा'; फडणवीसांची बदलापूरमधून टोलेबाजी

By

Published : Dec 26, 2019, 7:48 PM IST

ठाणे - विरोधाभासातून एकत्र येत सत्ता मिळवली आहे, तर सरकार व्यवस्थित चालवा, असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'अटलसंध्या' कार्यक्रमात त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यपद्धतीवर टीका केली. यावेळी, 'आता सत्तेत आला आहात; तर किमान मंत्रीमंडळाचा विस्तार करा,' असा टोमणा त्यांनी लगावला.

'आता तरी मंत्रीमंडळ विस्तार करा'; फडणवीसांची बदलापूरमधून टोलेबाजी

आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात रंगलेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून बोलताना, राज्य तुमच्या हाती असून त्याच्या संरक्षणासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा:'गेल्या ५ वर्षात शेतकऱ्यांना ५३ हजार कोटींची मदत'

विरोधाभासातून एकत्र येत या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ता स्थापन केल्याने हे सरकार चालवण्यासाठी आता खुद्द मुख्यमंत्र्यांनाच कसरत करावी लागणार आहे, असे ते म्हणाले. राज्याच्या इतिहासात कधीही मंत्रिमंडळ विस्ताराला एवढा वेळ लागला नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आता तरी मंत्रिमंडळाचा विस्तार करा, आणि राज्य चालवा, असा खोचक टोला त्यांनी यावेळी दिला. संबंधित कार्यक्रमात भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details