महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane News : मुख्यमंत्र्यांच्या घराशेजारील गरदुल्यांमुळे नागरीक हैराण; पोलिसांच्या दुर्लक्षामुळे उतरले रस्त्यावर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहत असलेल्या लुईस वाडी परिसरामध्ये नागरीक मागील अनेक वर्षांपासून गरदुल्यांमुळे त्रासलेले आहेत. वारंवार पोलिसांकडे तक्रारी करून देखील कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे आता चक्क त्यांनी पोलीस तक्रारीचे पोस्टर बनवून या परिसरामध्ये लावलेले आहेत.

Thane News
गरदुल्यांमुळे नागरीक हैराण

By

Published : Mar 26, 2023, 6:12 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरातील नागरिक प्रतिक्रिया व्यक्त करताना

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लुईस वाडी परिसरात निवासस्थान आहे. या निवासस्थानातील परिसरात नागरिकांना उपद्रव करणाऱ्या लोकांमुळे त्रास होत असल्याचे सांगितले जात आहे. दिवसभरात कोणत्याही वेळी लुईस वाडी परिसरामध्ये गरदुल्यांची असलेली गर्दी होणारा धूर यामुळे लुईसवाडी भागातील नागरिक त्रासलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या घराशेजारीच गर्दुल्ल्यांचा होणारा हा त्रास काही केला थांबत नसल्यामुळे या परिसरात राहणाऱ्या लहान मुले महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना आता मुख्यमंत्र्यांना विनंती करण्याची वेळ आलेली आहे.

मागणीसाठी नागरिक रस्त्यावर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थान परिसरात अनेक डझन पोलिसांचा संरक्षण आहे. दरम्यान, असे असले तरीही या परिसरात होत असलेल्या अवैध कामांवर पोलिसांना नियंत्रण ठेवता आलेले नाही. या संपूर्ण प्रभागातच लुईस वाडी हजुरी, पाईपलाईन रोड, वागळे इस्टेट या भागात अमली पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन शेकडो युवक करत आहेत. आणि या संपूर्ण प्रकाराला रोखण्यासाठी होणारी पोलिसांची कारवाई देखील नगण्य असल्यामुळे आता अनेक वर्षांचा पत्र व्यवहार केल्यानंतर नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागला आहे.



तीव्र आंदोलनाचा इशारा : नागरिकांनी याबाबत ईटीव्ही भारतसोबत संवाद साधला आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थान परिसरात काही ठराविक ठिकाणी दिवसभर चरस गांजा हे पदार्थ विकले जातात. त्यासाठी ठाण्यातील विविध भागातून युवक या भागात येतात. अंमली पदार्थ विकत घेतल्यानंतर ते त्याच ठिकाणी देखील त्याचा सेवन करतात आणि यामुळेच रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अनेकदा भांडणांचा हाणामाऱ्यांचा सामना देखील करावा लागतो. पोलिसांनी जर योग्य वेळीच कठोर कारवाई केली नाही तर यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे.

तत्काळ कारवाईची मागणी : परिसरातील नागरिकांनी सांगितले की, पोस्टर्स लावण्याच्या प्रकारानंतर काही दिवसांमध्ये यांना अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, आता या प्रकाराला देखील गरदुल्यांकडून भीक घातली जात नाही. म्हणून आणखीन पोस्टर लावत या परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या हलगर्जीपणाचा निषेध केलेला आहे. जोपर्यंत पोलिसांकडून तत्काळ कारवाई होणार नाही, तोपर्यंत हे पोस्टर्स हटवणार नाही अशी भूमिका देखील त्यांनी घेतलेली आहे.

हेही वाचा : Devendra Fadnavis News: गिरणी कामगारांच्या घरांकरिता कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात येईल- देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details