महाराष्ट्र

maharashtra

मुंबई-नाशिक महामार्गावर गोमांस वाहतूक करणाऱ्या मोटारीला अपघात; दोघे गंभीर जखमी

अवैधरित्या गोमांस घेऊन जाणाऱ्या चारचाकी मोटारीचा अपघात झाल्याची घटना कसारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाशिक-मुंबई वाहिनीवर घडली. या अपघातात मोटार चालक इम्रान शेख व हमीद शेख गंभीर जखमी झाले असून त्यांना खर्डी ग्रामीण रुग्णालयात प्रथोमोपचार करून शहापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

By

Published : Apr 25, 2021, 8:32 PM IST

Published : Apr 25, 2021, 8:32 PM IST

shahabaz
अपघात

ठाणे - नाशिक-मुंबई महामार्गावरून अवैधरित्या गोमांस घेऊन जाणाऱ्या चारचाकी मोटारीचा अपघात झाल्याची घटना कसारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाशिक-मुंबई वाहिनीवर घडली. या अपघातात मोटार चालक इम्रान शेख व हमीद शेख गंभीर जखमी झाले असून त्यांना खर्डी ग्रामीण रुग्णालयात प्रथोमोपचार करून शहापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ताबा सुटल्याने झाला अपघात

नाशिकहून मुंबईच्या दिशेने शनिवारी (दि. 25 एप्रिल) सायंकाळच्या सुमारास (एमएच 14 डीए 9096) क्रमांकाच्या मोटारी मध्ये जवळपास दीड टन गोमांसाची वाहतूक केली जात होती. त्याच सुमारास कसारा गाव हद्दीत येताच भरधाव वेगाने निघालेल्या कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी जवळपास रस्ता सोडून 30 मीटर अंतरावर जाऊन नाशिक वाहिनीवर आदळली. त्यात कार पलटी होताच गाडीच्या डिकीमधून गोमांस दुभाजकावर पसरले. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इम्रान शेख याची प्रकृती चिंताजनक असून हमीद शेख याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. यातील एकजण फरार झाला असल्याचे घटनास्थळी असलेल्या स्थानिक नागरिकांनी सांगितले. यावेळी कसारा गावातील तरुण सद्दाम सारंग, नजीर शेख यांनी इतर तरुणांच्या मदतीने जखमींना खर्डी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच कसारा प्रभारी पोलीस निरीक्षक केशवराव नाईक, उपनिरीक्षक सलमान खतीब, शहापूर महामार्ग पोलीस फौजदार गजेंद्र गुरव घटनास्थळी दाखल होऊन पंचानाम करत मोटार व गोमांस जप्त केले.

महिला डॉक्टरने दिले माणुसकीचे दर्शन

मुंबईहून निघालेल्या डॉ. दर्शना तावडे यांनी अपघातातील जखमीला पाहताच गाडी रस्त्याच्याकडेला थांबवली. रस्त्यावर कोसळलेल्या जखमी व्यक्तीचा रक्तस्राव आणि त्याची तळमळ पाहता त्याच्या हृदयावर पंपिंग करून त्याला जीवनदान देण्याचा प्रयत्न केला. या डॉक्टर महिलेने माणुसकीचे दर्शन घडवून प्रामाणिकपणे कर्तव्याची पावती दिली आहे. त्यांच्या या प्रथोमोपचाराने जखमीला पुढील उपचारासाठी दिलासा मिळाला.

जिल्हा सीमा नाकाबंदी असताना अवैद्यरित्या गोमांसची तस्करी

कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकोपाने सर्वत्र संचारबंदी लागू झाली असतानाही मुंबई-नाशिक महामार्गावर गोमांस वाहतूक होत आहे. गोमांस घेऊन जाणाऱ्या चालकाने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेली नाकाबंदी ठिकाणावरून पोलिसांना चकवा देऊन पळ काढला. मात्र, अपघातातून गोमांसाची वाहतूक होत असल्याची उघडकीस आले. सर्व व्यवहार बंद झाले असून कत्तलखाने सुरू कसे, हा मुद्दा उपस्थित होत आहे. त्यात जिल्हा सीमा नाकाबंदी असताना अवैद्यरित्या गोमांसची तस्करी केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा -मिरा भाईंदरमध्ये १० मे पर्यंत ऑक्सिजन प्लांट सुरू होणार; आयुक्त दिलीप ढोले यांची माहिती

हेही वाचा -कोरोना योद्धा: कळव्यातील डॉक्टर गेल्या वर्षभरापासून मोफत करताहेत रुग्णांची सेवा

ABOUT THE AUTHOR

...view details