महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात ६ लाखांचा गंडा घालणारी टोळी गजाआड

फिर्यादीने ५०० व २ हजार रुपयेयुक्त ६ लाख रुपये भिवंडी येथे आणले. येथे आरोपी राम दिगंबर गारोले उर्फ अजय उर्फ संदीप, शरीफ अब्दुल अजीम शेख, मोहम्मद नबीलाल उर्फ सिकंदर फकीर शेख, अनिल सोहनलाल गुप्ता उर्फ राजेश बन्सीलाल मिश्रा उर्फ शिवा, या भामट्यांच्या टोळीने त्यांच्या दोन बनावट पोलीस साथीदारांच्या मदतीने रोकड व्यवहारात लबाडी केली, तसेच फिर्यादीची रक्कम घेऊन पोबारा केला.

By

Published : Oct 1, 2020, 7:53 PM IST

आरोपी
आरोपी

ठाणे- मुबंईतील एका बांधकाम व्यावसायिकाला नोटा बदलून देत १५ टक्क्यांचे आमिष दाखवून ६ लाखांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा निजामपुरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शाहनवाज अब्दुल सत्तार शहा (वय ५१) असे फसवणूक झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीवरून निजामपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात टोळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे, केवळ मोबाईल लोकेशन व तांत्रिक बाबीच्या आधारे पोलिसांनी या टोळीला गजाआड केले आहे.

ठाण्यात ६ लाखांचा गंडा घालणारी टोळी गजाआड

राम दिगंबर गारोले उर्फ अजय, (वय २९ रा. खोका कंपाऊंड, भिवंडी ) शरीफ अब्दुल अजीम शेख, (वय ३० रा.मौलाना आझाद नगर, भिवंडी ) मोहम्मद नबीलाल उर्फ सिकंदर फकीर शेख, (वय २८ व रा. घुंगट नगर, भिवंडी) अनिल सोहनलाल गुप्ता उर्फ राजेश बन्सीलाल मिश्रा उर्फ शिवा, (वय ३८ वर्ष, रा. भादवड नाका, भिवंडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, टोळीतील २ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक शाहनवाज यांना टोळीतील एका आरोपीने संर्पक करून ५००, २ हजार रुपयांच्या नोटांच्या बदल्यात १०० रुपयांच्या नोटा, त्यात १५ टक्के कमिशनचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे, फिर्यादीने ५०० व २ हजार रुपयेयुक्त ६ लाख रुपये भिवंडी येथे आणले. येथे आरोपी राम दिगंबर गारोले उर्फ अजय उर्फ संदीप, शरीफ अब्दुल अजीम शेख, मोहम्मद नबीलाल उर्फ सिकंदर फकीर शेख, अनिल सोहनलाल गुप्ता उर्फ राजेश बन्सीलाल मिश्रा उर्फ शिवा, या भामट्यांच्या टोळीने त्यांच्या दोन बनावट पोलीस साथीदारांच्या मदतीने रोकड व्यवहारात लबाडी केली, तसेच फिर्यादीची रक्कम घेऊन पोबारा केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर निजामपुरा पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. मात्र, त्यांना घटनास्थळावर तपासनी केली असता काहीही मिळाले नाही. तसेच फिर्यादीला देखील आरोपींचे संपूर्ण नाव, पत्त्याबाबत माहिती नव्हती. मात्र, फिर्यादीकडून प्राप्त झालेले संशयित आरोपीचे मोबाईल संभाषण व दळणवळणाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडीत सापळा रचून चौघांना वेगवेगळ्या ठिकाणांवरून ताब्यात घेतले.

आरोपींकडून फिर्यादीच्या एकूण रक्कमेपैकी ३ लाख ९३ हजार ५५० रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आरोपींनी गुन्हासाठी वापरलेले वाहन, तसेच मोबाईल फोन, असा एकूण ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रमाणे सदर गुन्ह्यात आतापर्यंत ४ लाख ४७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील दोन आरोपींचा शोध सुरू असून गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि अमोल दाभाडे करीत आहे.

हेही वाचा-भिवंडीत एमआयएम अध्यक्षावर सहा दिवसात खंडणीचा चौथा गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details