महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उल्हासनगरात एकाच दिवशी ३ जणांची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

२ तरुणींने आत्महत्या केल्याच्या घटना मानेरेगाव परिसरात घडल्या. सपना शर्मा (१९) हिने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली

By

Published : Mar 14, 2019, 12:36 PM IST

३ जणांची गळफास घेऊन आत्महत्या

ठाणे- उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी ३ जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्यांमध्ये दोन तरूणींसह एका व्यक्तीचा समावेश आहे. या तिन्ही वेगवेगळ्या घटनांमुळे उल्हासनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर शहरातील कॅम्प नं ४ येथील ब्राम्हणपाडा परिसरात राहणारे अजय बर्वे (वय ३८) यांनी आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत २ तरुणींने आत्महत्या केल्याच्या घटना मानेरेगाव परिसरात घडल्या. सपना शर्मा (१९) हिने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर नेहा भोईर (वय २०) या तरूणीनेदेखील बेडरूममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

३ जणांची गळफास घेऊन आत्महत्या

या दोन्ही तरुणींच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस त्याचा तपास करीत आहेत. दरम्यान, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी घडलेल्या या ३ आत्महत्या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.


For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details