मुंबई - ठाणे महानगरपालिकेलगतच्या 14 गावांना नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करायला नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. तशी घोषणाच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (गुरुवारी) विधानसभेत केली आहे. ही गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करून घेण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून गावकऱ्यांकडून करण्यात येत होती. या निर्णयामुळे गावांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा सुनियोजितपणे विकास करणे शक्य होणार आहे. चौदा गावांचा महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून चर्चेत होता. याअधिवेशनात पुन्हा एकदा १४ गावांचा समावेशाचा प्रश्न आमदार प्रमोद पाटील, डॉ. बालाजी किणीकर, गणेश नाईक, रविंद्र चव्हाण यांनी मुद्दा उपस्थित केला होता.
ठाणे महानगरपालिकेलगत असलेली १४ गावे ही आधी नवी मुंबई महानगरपालिकेतच होती. मात्र त्यावेळी गावकऱ्यांनी आंदोलने केल्यामुळे ती नवी मुंबई महानगरपालिकेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यामुळे या गावांमध्ये रस्ते, पाणी, दिवाबत्ती यांच्या अडचणी निर्माण झाल्या. या अडचणी दूर करून त्यांना मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या या मागणीसाठी ही गावे पून्हा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेण्याची मागणी होऊ लागली. त्यामुळे ग्रामस्थांची ही मागणी लक्षात घेता ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करायला नगरविकास विभाग सकारात्मक असल्याचे मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
ठाणे महानगरपालिकेलगतच्या 14 गावांचा नवी मुंबईत समावेश होणार - 14 गावांना नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट
ठाणे महानगरपालिकेलगतच्या 14 गावांना नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करायला नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. आधी नवी मुंबई महानगरपालिकेतच होती. मात्र त्यावेळी गावकऱ्यांनी आंदोलने केल्यामुळे ती नवी मुंबई महानगरपालिकेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यामुळे या गावांमध्ये रस्ते, पाणी, दिवाबत्ती यांच्या अडचणी निर्माण झाल्या.
![ठाणे महानगरपालिकेलगतच्या 14 गावांचा नवी मुंबईत समावेश होणार विधान भवन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14826857-thumbnail-3x2-thnaaa.jpg)
'या' 14 गावांचा नवी मुंबईत होणार समावेश :या चौदा गावातील भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी आपण हा निर्णय घेतलेला असून याबाबत कायमच सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या गावांना नवी मुंबईत समावेश केल्यानंतर त्यांना मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिकता ठरवून टप्याटप्याने निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे देखील मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. यात, निगु, मोकाशी, पाडा, नावळी, भांडर्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळण, बाळे, दहिसर मोरी अशा 14 गावांचा यात समावेश आहे.
हेही वाचा -Mumbai Corona Update : मुंबईत ५४ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, शून्य मृत्यूची नोंद