महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 18, 2022, 8:35 AM IST

ETV Bharat / state

Sai Patil : 11 वर्षाची चिमुकली करणार 3 हजार किलोमीटरचा सायकल प्रवास ; एका महिन्यात कापणार अंतर

सई आशिष पाटील ही तवांग ते ठाणे हे 3 हजार किलोमीटरचे अंतर महिनाभरात सायकलवरून गाठणार (11 year old Sai Patil) आहे. 26 नोव्हेंबर रोजी सई आपल्या प्रवासाला सुरवात करणार (Sai Patil will cover distance of 3 thousand km) आहे. तीन हजार किलोमीटरचे अंतर आणि अनेक राज्यातील हा प्रवास करून ती महाराष्ट्रात येणार (cover distance of 3 thousand km in month) आहे.

Sai Patil
सई आशिष पाटील

ठाणे :ठाण्यातील बाळकुम गावातील एक चिमुकली नवीन तयारी करते (11 year old Sai Patil) आहे. मोठा मोठ्या माणसांना लाजवेल, असा सराव करतती तवांग ते ठाणे हे 3 हजार किलोमीटरचे अंतर महिनाभरात सायकलवरून गाठणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी सई आपल्या प्रवासाला सुरवात करणार (Sai Patil will cover distance of 3 thousand km) आहे. त्यानंतर आपल्या वडिलांसोबत ती तवांग येथून गेटवे ऑफ इंडियासाठी निघणार आहे. तीन हजार किलोमीटरचे अंतर आणि अनेक राज्यातील हा प्रवास करून ती महाराष्ट्रात येणार आहे. त्यासाठी तिचा आवश्यक तो सराव सुरू आहे. आणि आवश्यक ती तयारी कुटुंबीय देखील करत आहेत.

प्रतिक्रिया देताना सई आशिष पाटील व तिची आई


मोठा विक्रम :बाळकूम गावची जलपरी सई आशिष पाटील हिने वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी काश्मीर ते कन्याकुमारी हा प्रवास चक्क सायकलवरून पूर्ण करत मोठा विक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी सईने वयाच्या सहाव्या वर्षी ठाण्याच्या सुप्रसिद्ध खाडीवरून १०० फूट उंचीवरून उडी घेत अनोखा विक्रम केला आहे. तर वयाच्या सहाव्या वर्षी कंसाचा खडक ते उरण हे ११ किमी चे अंतर एक तासात पूर्ण केलेले आहे. सईचा खूप अभिमान वाटतो. संपूर्ण देशात तिचा नावलौकिक झालेला आहे. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना अशी शिकवण तर दिलीच पाहिजे. आणि खंबीरपणे मागे उभे राहिले पाहिजे, असे यावेळी सईच्या आई वडिलांचे म्हणणे (cover distance of 3 thousand km in month) होते .


याआधीचा मोठा रेकॉर्ड :गुरुवार १६ डिसेंबर २०२१ रोजी काश्मीर मधील कटरा येथील पवित्र वैष्णो देवीच्या प्रवेशद्वारापासून तिने प्रवास प्रारंभ केला. सुमारे ३६३९ किमीचा हा प्रवास तिने अवघ्या ३८ दिवसात पूर्ण केला. हे आकडे इतके मोठे आहेत, हे पाहताच आपण सर्वाना तिच्या मेहनतीचा अनुमान लावणे देखील कठीण होत आहे.


इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव :भारतात डिसेंबर जानेवारी म्हटले की, थंडी आलीच. त्यात या काळात उत्तरेकडील राज्यातील थंडीत सईने एकही विश्रांती न घेता आपला प्रवास पूर्ण केला. अनेक समस्या तिच्या प्रवासात आल्या असतील परंतु न डगमगता खंबीरपणे हा विक्रम सईने पूर्ण केला. या विक्रमाचे कौतुक नक्कीच शब्दात सामावणारे (Sai Patil will cover distance On bicycle) नाही.


अनेक रेकॉर्ड :अवघ्या 11 वर्षाच्या सईच्या या विक्रमाने बाळकूम गावासोबतच, ठाणे आणि महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. यापूर्वी सईने अश्या अनेक नेत्रदीपक कामगिरी केल्या आहेत. ठाणे महापौर जलतरण स्पर्धेत बॅकस्ट्रोक, फ्रीस्टायल, बटरफ्लाय, बेस्ट्रोक स्पर्धेत पदक पटकावली. क्षेत्र कार्ल ते बाळकूम ठाणे हा १२० किमीचा प्रवास फक्त सहा तासात पूर्ण केला. कारगिल ते काश्मीरक भारत मातेच्या संरक्षणार्थ वीरमरण आलेल्या शाहिद जवानांना श्रद्धांजली समर्पित करीत कारगिल ते श्रीनगर हा २२० किमी चा यशस्वी सायकल प्रवास केला. अमृतसर ते अटारी बॉर्डर हा भारतीय जवानांप्रती सायकल चालवीत अभिमान व्यक्त केला. जलपरी सई पाटील या विक्रमी सायकल प्रवासादरम्यान मुलगी वाचावा मुलगी शिकवा, स्त्रीभूण हत्या थांबवा, माझे आरोग्य माझी जबाबदारी असे विविध संदेश दिले आहेत. रस्त्यावर पडलेल्या मृत प्राण्याला बाजूला घेऊन जाऊन सईने लहान वयात माणुसकीचेही दर्शन घडवून दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details