महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गांधी परिवाराला विशेष सूरक्षा प्रदान करा; सोलापूर युवक कॉंग्रेसची मागणी - solapur youth congress

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना दिलेली सुरक्षा या केंद्रातील मोदी सरकारने काढून घेतली आहे. ती परत प्रदान करण्यासाठी सोलापूर युवक कॉंग्रेसने अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

सोलापूर युवक कॉंग्रेस

By

Published : Nov 17, 2019, 2:22 AM IST


सोलापूर - गांधी परिवाराला विशेष सुरक्षा व्यवस्था पुन्हा प्रदान करण्यात यावी, या मागणीचे निवेदन सोलापूर शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

विनोद भोसले यांची प्रतिक्रिया

केंद्रातील मोदी सरकारने राजकीय हेतूने प्रेरित होऊन गांधी परिवाराची विशेष सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे. असा आरोप सोलापूर कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेचा निषेध करत गांधी परिवाराला पुन्हा सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी, या मागणीसाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर काँग्रेस संघटनेच्या वतीने युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

सोलापूर यूवक कॉंग्रेस
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना दिलेली सुरक्षा या केंद्रातील मोदी सरकारने राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन काढून घेतली आहे. या परिवाराला असलेला जीवाचा धोका ओळखून, त्यांचा सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गांधी परिवाराला विशेष सुरक्षा व्यवस्था दिली होती. गांंधी परिवारातील सदस्यांच्या जीवाला कायमचा धोका असल्यामुळे गांधी परिवाराची विशेष सूरक्षा कायम ठेवावी, अशी मागणी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

हेही वाचा -सरकार पाच वर्ष टिकावं म्हणूनच बैठका सुरू - बाळासाहेब थोरात

ABOUT THE AUTHOR

...view details