सोलापूर - माढा तालुक्यातील खैरवाडी येथील मनीषा भांगे व गोरक भांगे या माय-लेकरांनी शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तीन गुंठे जमिनीतून त्यांनी हजारो रुपयांचे विविध बारमाही पीक घेतले आहे. याचा एकरी हिशोब केला असता 6 लाख रुपये उत्पन्न शेतकरी घेऊ शकतो, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तीन गुंठे पडीक जमिनीतून त्यांनी सेंद्रिय शेती करत विविध फळे, भाज्या पिकवल्या आहेत.
विविध पिकांनी फुलवलेल्या या सेंद्रिय शेतीला पाहण्यासाठी विविध शेतकरी भेट देत आहेत. भांगे कुटुंबीय त्यांना मोफत मार्गदर्शन करत मोफत बी-बियाणे वाटप करत आहे.
तीन गुंठे शेतीबरोबर बांधाचा उपयोग-
गोरक्षनाथ भांगे यांनी तीन गुंठे शेती सोबत शेतातील बांधाचा योग्य उपयोग कसा केला, याबाबत माहिती दिली. मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसाला भांगे कुटुंबीयांनी बांधा वर 400हुन अधिक सागाची झाडे लावली आहेत. मुलगा 20 किंवा 25 वर्षाचा होईपर्यंत ही झाडे देखील मोठी होतात. या झाडांची किंमत देखील पुढे भविष्यात 25 ते 30 लाख रुपयांपर्यंत जाईल. तसेच सागाच्या झाडांच्या मध्यभागी आधुनिक कल्पवृक्ष म्हणजेच शेवगा ही झाडे लावली आहेत. शेवगा फळ हे मानवी आरोग्यावर औषधी वनस्पती आहे. म्हणजेच सागाच्या झाडासोबत उत्पन्न देखील सुरू केले आहे.
काय आहे तीन गुंठे सेंद्रिय शेती मॉडेल-