सोलापूर - करमाळा तालुक्यातील कव्हे येथील अमोल भारत ताकमोगे या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. भारतने लऊळ गावात जाऊन विष घेतले. शेतातील पाईपलाईनचे कर्ज फेडण्याची चिंता असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन मुलगे, मुलगी, पत्नी व एक बहीण असा परिवार आहे.
हेही वाचा चंद्रपुरात कर्जबाजारी शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या
शेतात कांदे लावण्यासाठी रोपे आणतो, असे सांगून घरातून बाहेर गेलेल्या अमोल भारत ताकमोगे (वय-39) या शेतकऱ्याने विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली. अमोलने लऊळ (तालुका माढा) येथील संत कुर्मदास मंदिर शिवारात भिमा सिना जोड कालव्याच्या बोगद्यावरुन शेतामध्ये केलेल्या पाईपलाईनच्या कर्जाला कंटाळून हे कृत्य केल्याचे चुलत भाऊ सुभाष दिगंबर ताकमोगे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.