महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतीसाठी प्रलंबित वीज कनेक्शन देण्याच्या पालकमंत्री विजय देशमुख यांच्या सूचना

वीज कनेक्शन देण्यासाठी कंत्राटदारांकडून गतीने काम करून घ्या. कंत्राटदारांनी वेळेत काम न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत

By

Published : Jun 1, 2019, 8:15 AM IST

वीज कनेक्शन देण्याच्या पालकमंत्री विजय देशमुख यांच्या सूचना

सोलापूर- शेतीसाठी प्रलंबित असलेले वीज कनेक्शन तात्काळ द्या, अशा सूचना पालकमंत्री विजय देशमुख यांनी दिल्या आहेत. शेतीसाठीचे वीज कनेक्शन तात्काळ द्यायला हवीत. कनेक्शन देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत, तर वीज कनेक्शन तात्काळ पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशिय सभागृहात आयोजित खरीप हंगामपूर्व बैठकीस खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांची उपस्थिती होती.

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी शेतकऱयांना वीज कनेक्शन मिळवण्यासाठी फार वेळ लागू नये यासाठी आराखडा आखा आणि त्याची अंमलबजावणी करा, अशा सूचना दिल्या. तसेच बियाणे व खतांची मागणी आणि उपलब्ध असलेला साठा यांचा ताळमेळ घाला. मागणीनुसार खते आणि बियाणे उपलब्ध करून देण्याची सूचनाही पालकमंत्री विजय देशमुख यांनी केली.

वीज कनेक्शन देण्यासाठी कंत्राटदारांकडून गतीने काम करून घ्या. कंत्राटदारांनी वेळेत काम न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील शेततळी, सौरवीज आदींचे उद्दिष्ट पूर्ण करा, असेही त्यांनी सांगितले. खरीप दुष्काळ अनुदान वाटप, मदतीसाठी एक मास्टर डाटा तयार करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

2018-19 मध्ये 1 हजार 38 केाटी रुपयांचे पीककर्ज वितरण केले. 2019-20 मध्ये 1 हजार 411 कोटी रुपये कर्ज वितरणाचे उद्दीष्ट असल्याचे जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details