सोलापूर - धनगर समाज लवकरच राज्यभरात "ढोल बजाओ, सरकार जगाओ" आंदोलन करणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले आहे. राज्यभरातील धनगर समाज वेगवेगळ्या पातळ्यांवर हे आंदोलन करेल, असे ते म्हणाले. धनगर समाजाने या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला जागे करावे, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.
धनगर समाजाचे राज्यव्यापी 'ढोल बजाओ, सरकार जगाओ' आंदोलन - gopichand padalkar in solapur
राज्यभरातील धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी "ढोल बजाओ, सरकार जगाओ" आंदोलन करणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले आहे.
![धनगर समाजाचे राज्यव्यापी 'ढोल बजाओ, सरकार जगाओ' आंदोलन आमदार गोपीचंद पडळकर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8915766-1091-8915766-1600915791797.jpg)
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून 25 सप्टेंबर रोजी आपण पंढरपुरातील विठ्ठल मंदिरासमोर स्वतः ढोल वाजवत सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचे पडळकरांनी सांगितले. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमधून देखील राज्य सरकार विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. गेल्या दहा महिन्यांपूर्वी सरकार सत्तेत आहे. मात्र, धनगर आरक्षणाच्या बाबतीत एकही पाऊल सरकारने उचललेले नसल्याने हा आक्रोश होत असल्याचे पडळकर म्हणाले.
तर भाजपा सरकारने सत्तेत असताना धनगर समाजासाठी एक हजार कोटींची तरतूद केली होती. मात्र, त्यामधील एक रुपया सुद्धा या सरकारने दिला नाही. धनगर आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका देखील सरकारकडून घेण्यात आली नाही. त्याबरोबर धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांनाही आपण पत्र पाठवून तातडीने आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारकडून धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत दुजाभाव होत आहे. त्यामुळे आता समाजाच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असून येत्या 25 सप्टेंबर रोजी कुंभकरणाप्रमाणे झोपी गेलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले.